Kedar Jadhav : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाचं मैदान गाजवणार!

भाजपामध्ये करणार प्रवेश


मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकीय इनिंग सुरू करणार आहे. केदार जाधव लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.


केदार जाधव याने या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलारांचीही भेट घेतली होती. त्यावेळी केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव याचा पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईतील भाजपाच्या कार्यालायात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.



केदार जाधव हा मूळचा पुण्याचा आहे. महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा केदार जाधव भारताकडूनही खेळला आहे. त्याने भारतासाठी ७३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि ६ अर्धंशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने २७ विकेट्सही घेतल्या आहेत. केदार जाधवने केवळ ९ टी-२० सामन्यांमध्ये २०.3३३ च्या सरासरीने १२२ धावा केल्या आहेत. तर कसोटीमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता क्रिकेट नंतर तो राजकारणाचे मैदान गाजवणार आहे.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,