Kedar Jadhav : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाचं मैदान गाजवणार!

भाजपामध्ये करणार प्रवेश


मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकीय इनिंग सुरू करणार आहे. केदार जाधव लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.


केदार जाधव याने या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलारांचीही भेट घेतली होती. त्यावेळी केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव याचा पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईतील भाजपाच्या कार्यालायात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.



केदार जाधव हा मूळचा पुण्याचा आहे. महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा केदार जाधव भारताकडूनही खेळला आहे. त्याने भारतासाठी ७३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि ६ अर्धंशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने २७ विकेट्सही घेतल्या आहेत. केदार जाधवने केवळ ९ टी-२० सामन्यांमध्ये २०.3३३ च्या सरासरीने १२२ धावा केल्या आहेत. तर कसोटीमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता क्रिकेट नंतर तो राजकारणाचे मैदान गाजवणार आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील