Summer News : आईस्क्रीम खाताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

  65

भंडारा : भर उन्हाच्या कडाक्यात आईस्क्रीम खाण्याची लहर येणे साहजिकच आहे. मात्र हा आईस्क्रीम विकत घेताना ग्राहक त्याची माहिती जाणून न घेता खरेदी करतात. मोठ्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करताना ग्राहक ब्रँडच्या विश्वासार्हतेवर वस्तू खरेदी करतात. याचाच फटका भंडाऱ्यातील तुमसरा भागातील रिलायन्स मार्टमधून एक्सपायरी डेट संपलेल्या आईस्क्रीमची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. आईस्क्रीमचा खप संपवण्यासाठी मुख्य एक्सपायरी डेट लपवण्यासाठी दुकानदाराने जुन्या एक्सपायरी डेटवर स्टिकर लावल्याचे समजते आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील तुमसरा भागातील अभिषेक भुरे हा तरुण तुमसर शहरात असलेल्या रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये आईस्क्रीम खरेदी करायला गेला होता. यावेळी त्याला एक्सपायरी झालेली आईस्क्रीम विकत देण्याचा प्रयत्न मॉलमधील कर्मचाऱ्यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार काल (दि ७) रात्री उघडकीस आला. दिनशाज कंपनीची संत्रा बर्फी फ्लेवरची आईस्क्रीमची त्याने मागणी केली. त्याला तो आईस्क्रीमचा बॉक्स देण्यात आला, त्या बॉक्सवर एकावर एक दोन स्टिकर लावल्याचे आढळून आल्याने त्याने वरील स्टिकर काढला. खालच्या स्टिकरवर त्याला एक्सपायरी डेट संपली असल्याचं समजलं. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक