Devgiri Fort : देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात!

  115

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील देवगिरी किल्ला आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची बातमी समोर आली आहे. भर उन्हाच्या कडाक्यात देवगिरी किल्ल्याला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर मधील इतिहासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या दौलताबाद अर्थात देवगिरी किल्ल्याला चारही बाजुंनी आगीने घेरले आहे. आज सकाळी ८च्या दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. उन्हाळ्याच्या झळांमुळे ही आग भडकली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना आगीचे लोट पसरलेले आहे. तसेच आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणांत धूर पसरला असल्याचे समजते आहे.



यादरम्यान किल्ल्यावर वास्तव्यास असलेले लहान मोठे जीवाणू प्राणी जळून नष्ट झाले असून, मोर, लांडोर, माकडं आदि प्राणी सौरावैरा पळू लागली आणि त्यांनी किल्ल्याच्या परिसरातील शेतात आश्रय घेतला. किल्ला प्रशासनाने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अग्निशमन दलाच्या वाहनाला किल्ल्यात प्रवेश करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. आग विझवण्याचे कोणतेही साधन नसताना त्या ठिकाणी असलेल्या हिरव्या झाडाच्या फांद्या तोडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची पोलीस चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या

Mumbai Nanded Vande Bharat : मुंबई-जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार, जाणून घ्या वेळापत्रक, थांबे अन् तिकीटदर

मुंबई : मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू