CSK vs PBKS, IPL 2025 : चेन्नईला धावांचा पाठलाग करायला जमेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत): चेन्नईच्या संघाची पराजयाची शृंखला काही तुटत नाही. मागील चार सामन्यापैकी तीन सामने चेन्नईने गमावले आहेत. तिन्ही सामन्यात चेन्नईचा धावांचा पाठलाग करताना पराजय झालेला आहे. चेन्नईच्या फलंदाजाकडे सातत्य नाही आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड चारपैकी दोन सामने खेळला व दोन सामन्यात लवकर बाद झाला. रचिन रवींद्र पहिले दोन सामने खेळला व उर्वरित दोन सामन्यात लवकर बाद झाला. राहुल त्रिपाठीने तर सुरुवातीचे तिन्ही सामने मिळून २३ धावा केल्या, फक्त गेल्या सामन्यात तो खेळला.


आता पर्यंत सर्वच सामन्यात एखादा खेळाडू चांगला खेळतो व बाकी सर्व १५-२० धावा काढून बाद होतात आणि म्हणून चेन्नईचा संघ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरतो. आज चेन्नईला जास्ती जास्त धावा कशा होतील या कडे लक्ष द्यावे लागेल. धावांचा पाठलाग करण्याकरिता संघामध्ये महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे. चांगल्या फिनिशरची चेन्नईला गरज आहे.


चेन्नईचा सामना आज होणार आहे पंजाबशी, ज्यांनी आता पर्यंत दोन सामने जिंकले आहेत व एक सामना गमावला आहे. पंजाबचा संघ चेन्नई संघा पेक्षा फलंदाजी मध्ये अव्वल स्थानावर आहे. पंजाबचे आघाडीचे सर्वच फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. पंजाबला गेल्या सामन्यातील चुका ह्या सामन्यात भरून काढव्या लागतील.


आजचा सामना पंजाब घरच्या मैदानावर खेळत आहे त्यामुळे त्यांना थोडे दडपण येऊ शकते. चला तर बघूया चंदिगढच मैदान कोणाला साथ देते.

Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.