CSK vs PBKS, IPL 2025 : चेन्नईला धावांचा पाठलाग करायला जमेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत): चेन्नईच्या संघाची पराजयाची शृंखला काही तुटत नाही. मागील चार सामन्यापैकी तीन सामने चेन्नईने गमावले आहेत. तिन्ही सामन्यात चेन्नईचा धावांचा पाठलाग करताना पराजय झालेला आहे. चेन्नईच्या फलंदाजाकडे सातत्य नाही आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड चारपैकी दोन सामने खेळला व दोन सामन्यात लवकर बाद झाला. रचिन रवींद्र पहिले दोन सामने खेळला व उर्वरित दोन सामन्यात लवकर बाद झाला. राहुल त्रिपाठीने तर सुरुवातीचे तिन्ही सामने मिळून २३ धावा केल्या, फक्त गेल्या सामन्यात तो खेळला.


आता पर्यंत सर्वच सामन्यात एखादा खेळाडू चांगला खेळतो व बाकी सर्व १५-२० धावा काढून बाद होतात आणि म्हणून चेन्नईचा संघ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरतो. आज चेन्नईला जास्ती जास्त धावा कशा होतील या कडे लक्ष द्यावे लागेल. धावांचा पाठलाग करण्याकरिता संघामध्ये महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे. चांगल्या फिनिशरची चेन्नईला गरज आहे.


चेन्नईचा सामना आज होणार आहे पंजाबशी, ज्यांनी आता पर्यंत दोन सामने जिंकले आहेत व एक सामना गमावला आहे. पंजाबचा संघ चेन्नई संघा पेक्षा फलंदाजी मध्ये अव्वल स्थानावर आहे. पंजाबचे आघाडीचे सर्वच फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. पंजाबला गेल्या सामन्यातील चुका ह्या सामन्यात भरून काढव्या लागतील.


आजचा सामना पंजाब घरच्या मैदानावर खेळत आहे त्यामुळे त्यांना थोडे दडपण येऊ शकते. चला तर बघूया चंदिगढच मैदान कोणाला साथ देते.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत