मुंबई(ज्ञानेश सावंत): चेन्नईच्या संघाची पराजयाची शृंखला काही तुटत नाही. मागील चार सामन्यापैकी तीन सामने चेन्नईने गमावले आहेत. तिन्ही सामन्यात चेन्नईचा धावांचा पाठलाग करताना पराजय झालेला आहे. चेन्नईच्या फलंदाजाकडे सातत्य नाही आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड चारपैकी दोन सामने खेळला व दोन सामन्यात लवकर बाद झाला. रचिन रवींद्र पहिले दोन सामने खेळला व उर्वरित दोन सामन्यात लवकर बाद झाला. राहुल त्रिपाठीने तर सुरुवातीचे तिन्ही सामने मिळून २३ धावा केल्या, फक्त गेल्या सामन्यात तो खेळला.
आता पर्यंत सर्वच सामन्यात एखादा खेळाडू चांगला खेळतो व बाकी सर्व १५-२० धावा काढून बाद होतात आणि म्हणून चेन्नईचा संघ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरतो. आज चेन्नईला जास्ती जास्त धावा कशा होतील या कडे लक्ष द्यावे लागेल. धावांचा पाठलाग करण्याकरिता संघामध्ये महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे. चांगल्या फिनिशरची चेन्नईला गरज आहे.
चेन्नईचा सामना आज होणार आहे पंजाबशी, ज्यांनी आता पर्यंत दोन सामने जिंकले आहेत व एक सामना गमावला आहे. पंजाबचा संघ चेन्नई संघा पेक्षा फलंदाजी मध्ये अव्वल स्थानावर आहे. पंजाबचे आघाडीचे सर्वच फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. पंजाबला गेल्या सामन्यातील चुका ह्या सामन्यात भरून काढव्या लागतील.
आजचा सामना पंजाब घरच्या मैदानावर खेळत आहे त्यामुळे त्यांना थोडे दडपण येऊ शकते. चला तर बघूया चंदिगढच मैदान कोणाला साथ देते.
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…