Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे २१०० कडे लक्ष! 'या' तारखेपर्यंत मिळणार एप्रिलचा हप्ता

मुंबई : महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना'अंतर्गत (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना (Maharashtra Women) ९ हप्ते देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सरकारने रक्कम वाढवून २१०० करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याकडे लक्ष लागले असून यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीया आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील, अशी माहिती समोर येत आहे. परंतु अद्यापही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)



लाडक्या बहि‍णींना २१०० कधी मिळणार?


महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहि‍णींना कधीही २१०० रुपये देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे २१०० रुपये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला