Samudra Pradakshina : भारतीय महिलांची समुद्र प्रदक्षिणा

मुंबई : भारताच्या भूदल, नौदल आणि हवाई दलामधून निवड झालेल्या १२ महिला समुद्र प्रदक्षिणेला निघाल्या आहेत. या भारतीय महिलांच्या पथकाला समुद्र प्रदक्षिणेसाठी नौदल वॉटरमॅनशिप प्रशिक्षण केंद्र, कुलाबा, मुंबई येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीएमई) कमांडंट लेफ्टनंट जनरल ए.के. रमेश यांनी हिरवा झेंडा दाखवला. समुद्र प्रदक्षिणेला निघालेले भारतीय महिलांचे पथक मुंबई ते सेशेल्स आणि सेशेल्स ते मुंबई असा प्रवास करणार आहे. या प्रदक्षिणेच्या अनुभवाआधारे तयारी करुन २०२६ मध्ये भारतीय महिलांचे पथक आणखी एका धाडसी सागरी मोहिमेवर निघणार आहे.



भारताच्या बारा महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम सोमवार ७ एप्रिल २०२५ रोजी सुरू झाली. ही मोहीम ५५ दिवसांत पूर्ण केली जाईल. आयएएसव्ही त्रिवेणीवरून चार हजार सागरी मैलांचा प्रवास करुन महिलांचे पथक समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम यशस्वी करणार आहे. समुद्र प्रदक्षिणा या मोहिमेत महिलांचे पथक लहरी हवामान, अस्थिर समुद्र, बदलते वातावरण, प्रतिकूल परिस्थिती, यांत्रिक आणि शारीरिक आव्हाने अशा अनेक समस्यांना सामोरे जाणार आहे. या आव्हानांना लीलया पेलण्यासाठी खोल समुद्रात लवचिकता, बुद्धिमत्ता, संयम, धाडस, धैर्य आणि दृढनिश्चय यांचा कस लागणार आहे.

समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. तसेच राणी वेळू नाचियार, राणी दुर्गावती आणि राणी लक्ष्मीबाई सारख्या भारतातील महान योद्धा राण्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे.

महिलांच्या समुद्र प्रदक्षिणा या ऐतिहासिक प्रवासाचा समारोप ३० मे २०२५ रोजी मुंबईत ध्वजारोहण समारंभाने होईल. नारी शक्ती ही कोणत्याही आव्हानावर मात करण्यास सक्षम असलेली एक अटळ शक्ती आहे यावर समुद्र प्रदक्षिणा मोहिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होणार आहे.
Comments
Add Comment

एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच बैठकीत बांग्लादेशी विरोधात ऍक्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईमध्ये बोगस

मुंबईत आता फेरीवाल्यांची झाडाझडती

महापौरांच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांचे ओळखपत्रे आणि कागदपत्रे तपासणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे सभागृह उबाठाच्या काळात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिराने

महाराष्ट्रातून थंडी जाणार पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, कसं असेल हवामान ?

मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची

कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे

मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘हाय-टेक’ कॅप्टन; प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणेसाठी प्रयत्न

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश