Samudra Pradakshina : भारतीय महिलांची समुद्र प्रदक्षिणा

  57

मुंबई : भारताच्या भूदल, नौदल आणि हवाई दलामधून निवड झालेल्या १२ महिला समुद्र प्रदक्षिणेला निघाल्या आहेत. या भारतीय महिलांच्या पथकाला समुद्र प्रदक्षिणेसाठी नौदल वॉटरमॅनशिप प्रशिक्षण केंद्र, कुलाबा, मुंबई येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीएमई) कमांडंट लेफ्टनंट जनरल ए.के. रमेश यांनी हिरवा झेंडा दाखवला. समुद्र प्रदक्षिणेला निघालेले भारतीय महिलांचे पथक मुंबई ते सेशेल्स आणि सेशेल्स ते मुंबई असा प्रवास करणार आहे. या प्रदक्षिणेच्या अनुभवाआधारे तयारी करुन २०२६ मध्ये भारतीय महिलांचे पथक आणखी एका धाडसी सागरी मोहिमेवर निघणार आहे.



भारताच्या बारा महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम सोमवार ७ एप्रिल २०२५ रोजी सुरू झाली. ही मोहीम ५५ दिवसांत पूर्ण केली जाईल. आयएएसव्ही त्रिवेणीवरून चार हजार सागरी मैलांचा प्रवास करुन महिलांचे पथक समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम यशस्वी करणार आहे. समुद्र प्रदक्षिणा या मोहिमेत महिलांचे पथक लहरी हवामान, अस्थिर समुद्र, बदलते वातावरण, प्रतिकूल परिस्थिती, यांत्रिक आणि शारीरिक आव्हाने अशा अनेक समस्यांना सामोरे जाणार आहे. या आव्हानांना लीलया पेलण्यासाठी खोल समुद्रात लवचिकता, बुद्धिमत्ता, संयम, धाडस, धैर्य आणि दृढनिश्चय यांचा कस लागणार आहे.

समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. तसेच राणी वेळू नाचियार, राणी दुर्गावती आणि राणी लक्ष्मीबाई सारख्या भारतातील महान योद्धा राण्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे.

महिलांच्या समुद्र प्रदक्षिणा या ऐतिहासिक प्रवासाचा समारोप ३० मे २०२५ रोजी मुंबईत ध्वजारोहण समारंभाने होईल. नारी शक्ती ही कोणत्याही आव्हानावर मात करण्यास सक्षम असलेली एक अटळ शक्ती आहे यावर समुद्र प्रदक्षिणा मोहिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होणार आहे.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.