वानखेडेवर आज महामुकाबला: मुंबई विरुद्ध बेंगळुरू, खेळपट्टीचा फायदा कोणाला ? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : आयपीएल २०२५ चा २० वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. एकीकडे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स,यंदाच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून तर दुसरीकडे आयपीलच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या ताफ्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहेत.जसप्रीत बुमराहच्या संभाव्य पुनरागमनामुळे मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.



खेळपट्टीचा अहवाल


वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी ही लाल मातीची आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे मोठ्या धावसंख्या झाल्या आहेत आणि विशेषतः दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांना चांगला फायदा होतो. आतापर्यंत येथे झालेल्या ११७ आयपीएल सामन्यांपैकी ६३ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.


गोलंदाजीच्या दृष्टीने बोलायचे झाले तर, येथे वेगवान गोलंदाजांना फिरकी गोलंदाजांपेक्षा थोडा अधिक लाभ होतो. हरभजन सिंगने येथे सीएसके विरुद्ध ५/१८ अशी सर्वोत्तम स्पेल नोंदवली आहे, मात्र एकूण खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूलच राहिली आहे. त्यामुळे २००+ धावसंख्या प्रथम फलंदाजी करणाऱ्यांसाठी आवश्यक मानली जात आहे.



वानखेडेवरील काही महत्त्वाचे विक्रम


-सर्वोच्च सांघिक धावसंख्या: २३५ (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्स विरुद्ध केली)
-सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: नाबाद १३३ (एबी डिव्हिलियर्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
-सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल: ५/१८ (हरभजन सिंग – मुंबई इंडियन्स)



वानखेडेवरील हवामानाचा अंदाज


सामन्यादरम्यान मुंबईचे हवामान खेळासाठी पूर्णपणे अनुकूल राहणार आहे. तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस असेल, आकाश स्वच्छ राहील आणि वारे साधारणतः १६ किमी/ताशी वेगाने वाहतील. त्यामुळे पावसाचा कोणताही अडथळा राहणार नाही.सामन्याची महत्त्वाची पार्श्वभूमीआजच्या सामन्यात वानखेडेच्या खेळपट्टीचा विचार करता, फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली तर मोठी धावसंख्या उभारता येईल. परंतु लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्यांना येथे अधिक फायदा होत असल्याने नाणेफेक निर्णायक ठरू शकते.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए