शिर्डीत काल्याच्या किर्तनाने रामनवमी उत्सवाची सांगता

तीन दिवसीय उत्सवात तीन लाख ७२ हजार लाडू पाकिटांची विक्री


शिर्डी : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दि.५ एप्रिलपासून सुरु असलेल्या श्री रामनवमी उत्सवाची सांगता काल सोमवार दि.७ एप्रिल रोजी ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर श्री साईसमाधी मंदिरात दहीहंडी फोडून करण्यात आली. या तीन दिवसीय उत्सवात ७४ लाख लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली असल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली.


दरम्यान,सोमवारी उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ६.५० वाजता श्रींचे मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती मुख्य कार्यकारी भीमराज दराडे व त्यांच्या सुविधा पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी ७ वाजता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविध्य पत्नी वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. श्री राम नवमी उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी १० वाजता ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.गोरटे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील होते यांचे वंशज परिवारातील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब होते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,मंदिर पुजारी,शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली.दुपारी १ ते ३ या वेळेत द गोल्डन व्हॉइस स्टुडिओज मुंबई यांचा साई भजन संध्या कार्यक्रम दुपारी ३.३० ते ५ .३० या वेळेत श्रीमती पुजा राठोर, जयपुर यांचा साई भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सव कालावधीत पार पडलेल्या सर्व कार्यक्रमांना श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळाला.


संस्थानच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.तर रात्री १० वाजता शेजारती झाली.श्री रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज,मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे,वैद्यकीय संचालक डॉ.शैलेश वक,कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे,संरक्षण अधिकारी रोहिदास माळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील