शिर्डीत काल्याच्या किर्तनाने रामनवमी उत्सवाची सांगता

तीन दिवसीय उत्सवात तीन लाख ७२ हजार लाडू पाकिटांची विक्री


शिर्डी : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दि.५ एप्रिलपासून सुरु असलेल्या श्री रामनवमी उत्सवाची सांगता काल सोमवार दि.७ एप्रिल रोजी ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर श्री साईसमाधी मंदिरात दहीहंडी फोडून करण्यात आली. या तीन दिवसीय उत्सवात ७४ लाख लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली असल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली.


दरम्यान,सोमवारी उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ६.५० वाजता श्रींचे मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती मुख्य कार्यकारी भीमराज दराडे व त्यांच्या सुविधा पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी ७ वाजता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविध्य पत्नी वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. श्री राम नवमी उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी १० वाजता ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.गोरटे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील होते यांचे वंशज परिवारातील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब होते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,मंदिर पुजारी,शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली.दुपारी १ ते ३ या वेळेत द गोल्डन व्हॉइस स्टुडिओज मुंबई यांचा साई भजन संध्या कार्यक्रम दुपारी ३.३० ते ५ .३० या वेळेत श्रीमती पुजा राठोर, जयपुर यांचा साई भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सव कालावधीत पार पडलेल्या सर्व कार्यक्रमांना श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळाला.


संस्थानच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.तर रात्री १० वाजता शेजारती झाली.श्री रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज,मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे,वैद्यकीय संचालक डॉ.शैलेश वक,कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे,संरक्षण अधिकारी रोहिदास माळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा