शिर्डीत काल्याच्या किर्तनाने रामनवमी उत्सवाची सांगता

Share

तीन दिवसीय उत्सवात तीन लाख ७२ हजार लाडू पाकिटांची विक्री

शिर्डी : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दि.५ एप्रिलपासून सुरु असलेल्या श्री रामनवमी उत्सवाची सांगता काल सोमवार दि.७ एप्रिल रोजी ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर श्री साईसमाधी मंदिरात दहीहंडी फोडून करण्यात आली. या तीन दिवसीय उत्सवात ७४ लाख लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली असल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान,सोमवारी उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ६.५० वाजता श्रींचे मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती मुख्य कार्यकारी भीमराज दराडे व त्यांच्या सुविधा पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी ७ वाजता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविध्य पत्नी वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. श्री राम नवमी उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी १० वाजता ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.गोरटे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील होते यांचे वंशज परिवारातील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब होते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,मंदिर पुजारी,शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली.दुपारी १ ते ३ या वेळेत द गोल्डन व्हॉइस स्टुडिओज मुंबई यांचा साई भजन संध्या कार्यक्रम दुपारी ३.३० ते ५ .३० या वेळेत श्रीमती पुजा राठोर, जयपुर यांचा साई भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सव कालावधीत पार पडलेल्या सर्व कार्यक्रमांना श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळाला.

संस्थानच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.तर रात्री १० वाजता शेजारती झाली.श्री रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज,मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे,वैद्यकीय संचालक डॉ.शैलेश वक,कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे,संरक्षण अधिकारी रोहिदास माळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Recent Posts

Health: अशा लोकांनी चुकूनही आईस्क्रीम खाऊ नये

मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…

13 minutes ago

सरकारी अनास्थेमुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; मोखाड्यात पुन्हा बालमृत्यू, मातामृत्यूचे वाढते प्रमाण

मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…

6 hours ago

बेस्ट सुदृढ होणे, ही मुंबईकरांची गरज

मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…

6 hours ago

ही भारतासाठी सुवर्णसंधीच …

अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…

7 hours ago

लिंक मिडल ईस्ट कंपनी, दुबई

श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला.  आईला शिक्षणाची खूप…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…

8 hours ago