एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापणार

Share

मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत सध्या असह्य उकाडा सहन करावा लागत असून पुढील दोन ते तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा, उन्हाच्या झळा आणि काहिली यामुळे मुंबईकर अक्षरशः पोळून निघाले आहेत. मुंबईच्या तापमानात सतत चढ उतार सुरू आहेत. अचानक तापमानात वाढ होते तर कधी अचानक घट होते. या वातावरणाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

मार्च महिना सुरू झाला तरी तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-जास्त होत असल्याचेही दिसून आले. तीच परिस्थिती या महिन्यातही कायम आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी अंश ३३.९ सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तापमान कमी नोंदले गेले असले तरी, कोरड्या, उष्ण वाऱ्यांनी उकाड्याची जाणीव अधिक त्रासदायक झाली आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमानाचा पारा २४ ते २६ अंशापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सकाळच्या वेळीही अस्वस्थता जाणवू शकते. तर, कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशापर्यंत असेल. या कालावधीत आकाश निरभ्र असू शकेल, त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप होऊ शकेल.

मागील आठवड्यात मुंबईतील तापमानात सलग चार ते पाच दिवस घट झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना तापमान दिलासा मिळाला होता. मात्र, उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस मुंबईकरांना हा उकाडा सहन करावा लागणार आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्पाचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटांची शक्यता आहे.

Recent Posts

शिल्लक सेनेचे दिशाहीन मेळावे

उबाठा शिवसेनेचा निर्धार मेळावा नाशिकमध्ये पार पडला, अर्थात हा उबाठा शिवसेनेच्या प्रमुखांच्या भाषणांमध्ये गेल्या तीन-साडेतीन…

3 hours ago

MI vs SRH, IPL 2025: मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर ‘लय भारी’ विजय

मुंबई: वानखेडेच्या मैदानार इंडियन प्रीमियर लीगमधील ३३व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर जबरदस्त विजय मिळवला…

5 hours ago

जानसू रेल्वे बोगद्याचे काम ऐतिहासिक:अश्विनी वैष्णव

देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचा मार्ग मोकळा डेहराडून : जानसू रेल्वे बोगद्याचे काम ऐतिहासिक असून,देशातील…

5 hours ago

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात राज्यसेवेची मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या…

5 hours ago

ससूनच्या अहवालात दीनानाथ रुग्णालय व डॉ. घैसास यांना क्लीन चिट

पुणे : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर…

6 hours ago

बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

नवी मुंबई : उन्हाचा वाढता जोर आणि त्यात वातावरणात अचानक बदल यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण…

6 hours ago