अपात्र शिधापत्रिका रद्द होणार; १ एप्रिलपासून सुरुवात

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ३१ मे पर्यंत शोधमोहीम चालणार


मुंबई (प्रतिनिधी): अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने राज्यभरातील अपात्र शिधापत्रिका (रेशनकार्ड) रद्द करण्यासाठी १ एप्रिलपासून शोधमोहीम हाती घेतली आहे. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशनकार्ड दिल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. विभागाने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला. ही शोधमोहीम दोन महिने म्हणजे २१ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. अपात्र रेशनकार्ड शोधण्याची मोहीम २८ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार हाती घेण्यात आली होती. पण त्यानंतर चारच महिन्यात त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आता पुन्हा नव्याने सुधारित मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच ती दरवर्षी राबवली जाणार आहे.


अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच काडांची तपासणी आता केली जाईल. जो कार्ड अपात्र असल्याचे आढळेल ती लगेच रद्द केली जाणार आहेत. सर्व रेशन दुकानदारांना त्यांच्याकडील काडांची तपासणी करण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहेत. ते फॉर्म भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहेत ते स्पष्ट होईल. अर्ज भरताना वास्तव्याचा पुरावा सोबत द्यावा लागेल. हा पुरावा एक वपपिक्षा जुना नसावा, ही मुख्य अट आहे. कार्डधारकांकडून आलेल्या माहितीची तपासणी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल त्यांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत पुरावा सादर न केल्यास रेशनकार्ड रद्द करण्पात येणार आहे.


एका पत्त्यावर दोन रेशनकार्ड असतील किंवा एका कुटुंबात दोन रेशनकार्ड दिलेली असतील, तर त्यातील एक रद्द केले जाणार आहे. या शोधमोहिमेत शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी, कामगार ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि अशांकडे पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड असेल तर ती तत्काळ अपात्र ठरविली जातील. त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार रेशनकार्ड दिले जाईल. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती आणि मृत व्यक्तींना लाभार्थीच्या मादीतून वगळले जाणार आहे.

Comments
Add Comment

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,