Mumbai Railway News : पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार

मुंबई : पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. यामुळे प्रत्येक लोकल फेरीद्वारे जास्त प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जाणे शक्य होणार आहे.



सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज १२५० लोकल फेऱ्या होता. यापैकी किमान ७९ फेऱ्या या १५ डब्यांच्या गाड्यांच्या असतात. उर्वरित लोकल फेऱ्यांसाठी १२ डब्यांच्या गाड्यांचाच वापर होतो. नव्या योजनेनुसार पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. यामुळे १५ डब्यांच्या गाड्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार आहेत. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार या धीम्या मार्गावर एकूण चौदा स्थानकांवर २७ फलाटांचा (प्लॅटफॉर्म) १५ डब्यांच्या गाड्यांसाठी करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेने साठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या किमान १०० वाढवण्याचे नियोजन आहे. ही योजना यशस्वी झाल्यास पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ७९ वरुन १७९ वर पोहोचेल. यामुळे एका लोकल फेरीद्वारे अधिकाधिक प्रवाशांना वेगाने, वाजवी दरात आणि सुरक्षितरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण