Mumbai Railway News : पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार

Share

मुंबई : पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. यामुळे प्रत्येक लोकल फेरीद्वारे जास्त प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जाणे शक्य होणार आहे.

सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज १२५० लोकल फेऱ्या होता. यापैकी किमान ७९ फेऱ्या या १५ डब्यांच्या गाड्यांच्या असतात. उर्वरित लोकल फेऱ्यांसाठी १२ डब्यांच्या गाड्यांचाच वापर होतो. नव्या योजनेनुसार पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. यामुळे १५ डब्यांच्या गाड्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार आहेत. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार या धीम्या मार्गावर एकूण चौदा स्थानकांवर २७ फलाटांचा (प्लॅटफॉर्म) १५ डब्यांच्या गाड्यांसाठी करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेने साठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या किमान १०० वाढवण्याचे नियोजन आहे. ही योजना यशस्वी झाल्यास पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ७९ वरुन १७९ वर पोहोचेल. यामुळे एका लोकल फेरीद्वारे अधिकाधिक प्रवाशांना वेगाने, वाजवी दरात आणि सुरक्षितरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य होणार आहे.

Recent Posts

Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…

17 minutes ago

Electric Vehicles : महाराष्ट्र दिनापासून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

मुंबई  : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…

24 minutes ago

वेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची गरज

रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…

37 minutes ago

Mumbai : पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करा

मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…

40 minutes ago

MP Narayan Rane : ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी मा.खा. नारायण राणेंचा पुढाकार

मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…

42 minutes ago

ड्रोन कॅमेऱ्याने सुसज्ज दीदी

रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…

45 minutes ago