Mumbai Railway News : पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार

  62

मुंबई : पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. यामुळे प्रत्येक लोकल फेरीद्वारे जास्त प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जाणे शक्य होणार आहे.



सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज १२५० लोकल फेऱ्या होता. यापैकी किमान ७९ फेऱ्या या १५ डब्यांच्या गाड्यांच्या असतात. उर्वरित लोकल फेऱ्यांसाठी १२ डब्यांच्या गाड्यांचाच वापर होतो. नव्या योजनेनुसार पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. यामुळे १५ डब्यांच्या गाड्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार आहेत. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार या धीम्या मार्गावर एकूण चौदा स्थानकांवर २७ फलाटांचा (प्लॅटफॉर्म) १५ डब्यांच्या गाड्यांसाठी करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेने साठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या किमान १०० वाढवण्याचे नियोजन आहे. ही योजना यशस्वी झाल्यास पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ७९ वरुन १७९ वर पोहोचेल. यामुळे एका लोकल फेरीद्वारे अधिकाधिक प्रवाशांना वेगाने, वाजवी दरात आणि सुरक्षितरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

प्रहार आरबीआय रेपो दर विश्लेषण: रेपो दर घटला पण अर्थव्यवस्थेचे काय ? वाचा अर्थतज्ज्ञांची मते.....

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात

Stock Market: रेपो दर कपातीचे बाजाराकडून 'बुल' स्वागत सेन्सेक्सची ८४५ तर निफ्टीची २७४ अंकाने उसळी !

प्रतिनिधी: आरबीआयच्या रेपो दरात कपात करण्याचा निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराने जोरात सुरू केले आहे. आरबीआयच्या २५

मोठी बातमी RBI News: रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात सर्वसामान्यांचे कर्जाचे होणार स्वस्त,११ महिने पुरेल इतके विदेशी चलनसाठा

प्रतिनिधी: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचे कामगार मंत्र्यांना साकडे

मुंबई : विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या 'गो ग्रीन' उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई :मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश मुंबई:आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या