Narayan Rane vs Uddhav Thackeray : 'चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम'

मुंबई : विकास, समृद्धी ही उद्धव ठाकरेंची कामंच नाहीत. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे. यामुळे त्यांचा पक्ष लहान होत चालला आहे. पुढच्या निवडणुकीनंतर हा पक्ष राहणार नाही, असे भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले. ते रामनवमीनिमित्त शिर्डीत सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरं देताना चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे, असे भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले.



प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही भाजपा खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिले. संजय राऊत या व्यक्तीने खासदार म्हणून देशासाठी, राज्यासाठी आणि स्वतःच्या गावासाठी काय योगदान दिले आहे ? असा प्रतिप्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. काही तरी बोलून चर्चेत राहणे आणि वाद निर्माण करत राहणे हेच काम संजय राऊत करत असल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले.
Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे