US Tariff : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात भारताला आणखी सवलत मिळणार ?

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ अर्थात कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना अमेरिकेतील कारखान्यात तयार होणाऱ्या पक्क्या मालासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून येणाऱ्या अनेक भारतीय वस्तू तसेच अमेरिकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या भारतीय वस्तू यांना टॅरिफमधून सवलत देण्यात आली आहे. आता अमेरिका भारताला द्यायच्या सवलतीत आणखी वाढ करण्याचा विचार करत आहे. या मुद्यावर भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळांची चर्चा सुरू आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार भारत, इस्रायल आणि व्हिएतनाम या तीन देशांच्या प्रतिनिधी मंडळांशी अमेरिका चर्चा करत आहे.



भारत - अमेरिका यांच्यातील आयात - निर्यात व्यापारात दोन्ही देशांच्या लाभांचा विचार करुन तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. द्विपक्षीय व्यापार कराराची बोलणी यशस्वी झाल्यास भारताला टॅरिफमधून मिळत असलेल्या सवलतीत आणखी वाढ होणार आहे. अमेरिकेने सध्या चीन आणि कॅनडा या देशांसोबत द्विपक्षीय व्यापार कराराबाबत नव्याने चर्चेचा विचार करत नसल्याचे जाहीर केले.





अमेरिकेने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ते ९ एप्रिल पासून भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ अर्थात कर लागू करार आहेत. व्हिएतनामच्या वस्तूंवर ४६ टक्के आणि इस्रायलच्या वस्तूंवर १६ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल