लंडनहून मुंबईला येणारे विमान तुर्की विमानतळावर दोन दिवसापासून अडकले; २५० हून अधिक प्रवासी

अंकारा : भारतीयांसह २५० हून अधिक व्हर्जिन अटलांटिक विमान कंपनीचे प्रवासी तुर्कीमधील विमानतळावर ४० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. लंडनहून मुंबईला येणारे विमान दियारबाकीर विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले होते. लंडन हिथ्रो येथून मुंबईला जाणारे विमान परतण्याची शक्यता आहे. व्हर्जिन अटलांटिकने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी पर्यायी फ्लाइटची व्यवस्था करण्यासह सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.


लंडन-मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानातील २५० हून अधिक प्रवाशांना दोन दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांश भारतीय आहेत. सर्व प्रवासी तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर ४० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. २ एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणारे VS358 हे विमान आपत्कालीन परिस्थितीमुळे दियारबाकीर विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, लँडिंग केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मात्र त्यानंतर प्रवाशांची मुंबईला परतण्याबाबत कोणतीही सुविधा करण्यात आली नव्हती.



विमानातल्या बिघाडानंतर क्रूला हॉटेलमध्ये नेण्यात आले तर प्रवाशांना छोट्या प्रादेशिक विमानतळामधील भागात थांबवण्यात आले. मात्र तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना दोन दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीनंतर काही प्रवाशांना जवळच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत परतीच्या प्रवासासाठी दुसरे विमान तयार होईल, असे एअरलाइनने सांगितले होते. मात्र काही प्रवासी अजूनही विमानतळ ट्रान्झिट होल्डिंग एरियामध्ये आहेत.


अडकलेल्या प्रवाशांपैकी एकाने सांगितले की, त्यांना जमिनीवर बसण्यास भाग पाडले गेले. त्यांना ब्लँकेटही देण्यात आले नाही. याशिवाय, शाकाहारी जेवण उपलब्ध नाही, असे एका प्रवाशाने सांगितले. मात्र व्हर्जिन अटलांटिकने सांगितले की, तुर्कीमध्ये प्रवाशांना रात्रीसाठी हॉटेल आणि अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. २७५ प्रवाशांमध्ये एक शौचालय आहे. त्यांच्याकडे अडॅप्टर नसल्याने फोनची बॅटरी संपत आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, मधुमेहाचे रुग्ण आणि वृद्धांना हा त्रास सहन करावा लागतोय, असेही एका प्रवाशाने सांगितले.


दरम्यान, तुर्कस्तानमधील भारतीय दूतावासाने या घटनेनंतर सक्रिय भूमिका घेतली आहे. भारतीय दूतावासाने एअरलाइन, दियारबाकीर विमानतळ संचालक आणि तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. दूतावासाने या प्रकरणावर एक निवेदन जारी करुन प्रवाशांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. ही समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी पर्यायी विमान व्यवस्था करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत, असेही दूतावासाने म्हटलं.

Comments
Add Comment

Missing Link : 'सेल्फी' साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; एमएसआरडीसीचे वाहनधारकांना आवाहन

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी

Rajasthan Royals : मित्तल कुटुंबीयाने आदर पूनावालांसह राजस्थान रॉयल्स संघ १५,६६० कोटी रुपयांना घेतला विकत

मुंबई : राजस्थान रॉयल्सला नवीन मालक मिळाले आहेत. स्टील किंग लक्ष्मी मित्तल आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे

Kapil Sharma Cafe : कपिल शर्माच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’जवळ पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी

मुंबई : एकदा पुन्हा कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील रेस्टॉरंट ‘कॅप्स कॅफे’ जवळ गोळीबार झाल्याची घटना समोर

Metro Line 4 : मुंबई मेट्रो लाईन ४ अपघातांबाबतचे चौकशी अहवाल सार्वजनिक करा - मुलुंड भाजप आमदार मिहिर कोटेचा

आमदार मिहिर कोटेचा यांचे एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्र मुलुंडमधील प्रकल्पात वारंवार सुरक्षा

Women's T20 World Cup : मुंबई महिला लीगचे पहिल्यांदाच आयोजन; इरा जाधव सर्वात महागडी क्रिकेटपटू

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामादरम्यान टी२० मुंबई लीगचा लिलाव पार पडला. पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच, फ्रँचायझींनी महिला

Casting Yard Accident : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू