Crime : संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या, डोक्यात मारला हातोडा

नोएडा : उत्तर प्रदेशमधील नोएडात ५५ वर्षांच्या नुरुल्लाह हैदरने पत्नी आसमा खान (४२) हिच्या डोक्यात हातोड्याने वार केला. या हल्ल्यात आसमाचा मृत्यू झाला. आसमाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नुरुल्लाह हैदरला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी नोएडाच्या सेक्टर १५ मध्ये घडली.

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली ४२ वर्षांची आसमा खान नोएडाच्या सेक्टर ६२ मधील एका खासगी कंपनीत कार्यरत होती. निकाह होण्याआधी आसमा दिल्लीच्या पूर्वेकडील भागात वास्तव्यास होती. जामिया मिलिया इस्लामियामधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर आसामाने करिअर सुरू केले होते. तर अटकेत असलेला आरोपी नुरुल्लाह हैदर बेकार होता. त्याची नोकरी सुटली होती.

नुरुल्लाह हैदर आणि आसमा खान यांचा निकाह २००५ मध्ये झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर मुलगी आठवीत शिकते आहे.

नोकरी सुटल्यामुळे घरात बसलेल्या नुरुल्लाह हैदरला पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय आला होता. या संशयातून नुरुल्लाह हैदर आणि आसमा खान यांचा वारंवार वाद होत होता. घटना घडली त्याच्या आदल्या दिवसापासून याच मुद्यावरुन सुरू असलेला वाद वाढला होता. वाद विकोपाला गेला आणि नुरुल्लाह हैदरने पत्नी आसमा खानच्या डोक्यात हातोड्याने वार केला. या हल्ल्यात आसमाचा मृत्यू झाला. आसमाच्या हत्येनंतर पोलिसांनी नुरुल्लाह हैदरला अटक केली. नुरुल्लाह हैदर अभियांत्रिकीचा पदवीधर आहे, तो मूळचा बिहारचा आहे.

जोपर्यंत नुरुल्लाह हैदर आणि आसमा हे दोघे नोकरी करत होते तोपर्यंत तणाव नव्हता. पण नुरुल्लाह हैदरची नोकरी सुटली आणि काही काळानंतर तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसमाची हत्या झाल्याची जाणीव होताच तिच्या मुलाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी नुरुल्लाह हैदरला अटक केली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. नातलगांना नुरुल्लाह हैदरच्या कृत्याने धक्का बसला आहे.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव