BSF : भारत - पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत घुसखोर ठार

जम्मू : भारत - पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत एक घुसखोर ठार झाला. ही घटना जम्मू सेक्टरमध्ये घडली.



जम्मू सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दल सावध झाले. जवान डोळ्यात तेल घालून घुसखोर सीमेवर लक्ष ठेवू लागले. पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न सुरू होताच सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. या कारवाईत एक घुसखोर ठार झाला. घुसखोराला आधी शरण येण्याचा इशारा देण्यात आला होता. पण या इशाऱ्याला न जुमानता घुसखोर पुढे येत असल्याचे बघून त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. य गोळीबारात घुसखोर ठार झाला.

ताज्या घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती देत भारताच्या सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजर्सच्या अधिकाऱ्यासमोर निषेध नोंदवला आहे. पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झाला तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. घुसखोराची ओळख पटविण्याची तसेच घुसखोरीचा प्रयत्न करण्यामागचे कारण जाणून घेण्याची कारवाई सीमा सुरक्षा दलाने सुरू केली आहे.

 
Comments
Add Comment

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.