बीएसएनएलने जोडले ५५ लाखांहून अधिक नवे ग्राहक

ज्योतिरादित्य शिंदे यांची राज्यसभेत माहिती


नवी दिल्ली : भारत दूरसंचार निगम लिमीटेडने (बीएसएनएल) गेल्या ७ महिन्यात ५५ लाखांहून अधिक नवीन ग्राहक सामील झाले आहेत, ज्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या ९.१ कोटी झाली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

यासंदर्भात शिंदे यांनी सांगितले की, जून २०२४ ते या वर्षी फेब्रुवारीपर्यंत बीएसएनएल ग्राहकांची संख्या ८.५५ कोटींवरून ९.१ कोटी झाली आहे. बीएसएनएल तब्बल १८ वर्षांनंतर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत नफ्यात आली आहे. देशभरातील ज्या गावांमध्ये मोबाईल सेवा पोहोचलेल्या नाहीत, तिथे ४-जी मोबाईल सेवा पुरवण्यासाठी बीएसएनएल एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याची एकूण किंमत २६,३१६ कोटी रुपये आहे. यामध्ये विद्यमान २-डी बीटीएसला ४-जी मध्ये अपग्रेड करणे देखील समाविष्ट आहे. याशिवाय, बीएसएनएल एलडब्ल्यूई फेज-1 योजनेअंतर्गत स्थापित केलेल्या २३४३ विद्यमान २जी बीटीएसचे २जी ते ४जी पर्यंत अपग्रेडेशन देखील करत आहे, ज्याची अंदाजे किंमत १८८४.५९ कोटी रुपये असल्याचे शिंदे म्हणाले.

भारत 4-जी नेटवर्क उपकरणे तयार करणारा जगातील पाचवा देश बनला आहे. देशात एक लाख 4-जी टॉवर बसवण्याचे लक्ष्य साध्य केल्यानंतर बीएसएनएल ५-जीची अंमलबजावणी सुरू करेल. सुमारे ७३. ३२६ 4-जी टॉवर बसवण्यात आले आहेत, जे एकूण कामाच्या सुमारे ७३ टक्के आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

भारतात 5-जी ची अंमलबजावणी जगात सर्वात जलद झाली आहे आणि गेल्या एका वर्षात ९९ टक्के जिल्हे आणि ८२ टक्के लोकसंख्या या योजनेत समाविष्ट झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव