बीएसएनएलने जोडले ५५ लाखांहून अधिक नवे ग्राहक

ज्योतिरादित्य शिंदे यांची राज्यसभेत माहिती


नवी दिल्ली : भारत दूरसंचार निगम लिमीटेडने (बीएसएनएल) गेल्या ७ महिन्यात ५५ लाखांहून अधिक नवीन ग्राहक सामील झाले आहेत, ज्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या ९.१ कोटी झाली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

यासंदर्भात शिंदे यांनी सांगितले की, जून २०२४ ते या वर्षी फेब्रुवारीपर्यंत बीएसएनएल ग्राहकांची संख्या ८.५५ कोटींवरून ९.१ कोटी झाली आहे. बीएसएनएल तब्बल १८ वर्षांनंतर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत नफ्यात आली आहे. देशभरातील ज्या गावांमध्ये मोबाईल सेवा पोहोचलेल्या नाहीत, तिथे ४-जी मोबाईल सेवा पुरवण्यासाठी बीएसएनएल एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याची एकूण किंमत २६,३१६ कोटी रुपये आहे. यामध्ये विद्यमान २-डी बीटीएसला ४-जी मध्ये अपग्रेड करणे देखील समाविष्ट आहे. याशिवाय, बीएसएनएल एलडब्ल्यूई फेज-1 योजनेअंतर्गत स्थापित केलेल्या २३४३ विद्यमान २जी बीटीएसचे २जी ते ४जी पर्यंत अपग्रेडेशन देखील करत आहे, ज्याची अंदाजे किंमत १८८४.५९ कोटी रुपये असल्याचे शिंदे म्हणाले.

भारत 4-जी नेटवर्क उपकरणे तयार करणारा जगातील पाचवा देश बनला आहे. देशात एक लाख 4-जी टॉवर बसवण्याचे लक्ष्य साध्य केल्यानंतर बीएसएनएल ५-जीची अंमलबजावणी सुरू करेल. सुमारे ७३. ३२६ 4-जी टॉवर बसवण्यात आले आहेत, जे एकूण कामाच्या सुमारे ७३ टक्के आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

भारतात 5-जी ची अंमलबजावणी जगात सर्वात जलद झाली आहे आणि गेल्या एका वर्षात ९९ टक्के जिल्हे आणि ८२ टक्के लोकसंख्या या योजनेत समाविष्ट झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

१ एप्रिलपासून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा सुरू

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या

जम्मू-कश्मीरमध्ये बर्फवृष्टी

राष्ट्रीय महामार्ग बंद, २० हून अधिक उड्डाणे रद्द श्रीनगर : जम्मू विभागातील उंच भागांमध्ये शुक्रवारी जोरदार

उष्णतेत वाढ, पावसात घट? एल निनोमुळे मान्सून धोक्यात

जूननंतर एल निनो सक्रिय होण्याची शक्यता नवी दिल्ली : देशात यंदाच्या मान्सूनबाबत चिंताजनक चिन्हे दिसून येत आहेत.

कर्नाटकात बाईक टॅक्सीला उच्च न्यायालयाकडून परवानगी

बंगळूरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली, तर बाईक टॅक्सी अॅग्रीगेटर्स,

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र