लाखो रुपयांचा खर्च तरी पाणी टंचाई मिटेना

कोल्हेधव वाशियांचा घसा पडला कोरडा


मोखाडा : गाव पाड्यातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतीना वर्षाकाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो.तरीदेखील गाव पाड्यातील पाणी टंचाईची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.त्यामुळे अशा मानवनिर्मित पाणी टंचाईचे चटके गेल्या काही वर्षांपासून कोल्हेधव गावातील नागरिकांना सहन करावे लागत आहेत.



सहा घरांची वस्ती असलेल्या कोल्हेधव गावात जेमतेम तीस ते चाळीस माणसं राहतात येथील नागरिकांना इतर मुलभूत सुविधांची तर वानवा आहेच परंतु त्याही पेक्षा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे यासाठी मागील सात आठ वर्षांत वीस ते पंचवीस लाख रुपयांचा निधी हा केवळ पाणी टंचाई दुर करण्यासाठी खर्च केलेला असताना ही येथील नागरिकांना महिन्याभरापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.महत्वाचे म्हणजे कोल्हेधव गाव मोखाडा तालुक्यात येत असून पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील बलद्याचापाडा मार्गाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव, काकडवळण या मार्गाने जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर चे अंतर पार करून कोल्हेधव गावाला पाणी पुरविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.परंतू टॅंकर ये जा करण्यासाठी संपूर्ण दिवस जाणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी सूचना पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे कर्मचारी यांनी बोलताना सांगितले आहे.मुळात कोल्हेधव गावात यायला जायला पूल बांधला असता तर शासनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले असते.परंतू लोकसंख्येचा आकडा लक्षात घेता या पाड्याला पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्यास अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.यामुळे शासनाची नियमावलीच लोकांच्या जीवांवर उठली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


ग्रामपंचायतीकडून नवीन विहीर बांधणे,जुन्या विहीरीची दुरुस्ती करणे यासह सौरऊर्जेवर चालणारी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे अशा पाणी पुरवठ्याच्या योजनांवर लाखो रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झालेला असताना ही पाणी टंचाई संपायला तयार नाही. त्यामुळे खर्च केलेला निधी नेमका जातो कुठे? याचा प्रशासनाने शोध घेतला पाहिजे.


ग्रामपंचायतकडून विहीरीची दुरुस्ती करून येत्या दोन तीन दिवसांत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली जाईल. - जी. लष्करी, ग्रामपंचायत अधिकारी आसे

Comments
Add Comment

Bakrid 2026 : किरीट सोमय्यांचा थेट इशारा; "मीरा रोडच्या नया नगरमध्ये 'नवा पाकिस्तान' करू पाहणाऱ्यांना खपवून घेणार नाही!

मीरा भाईंदर : आगामी बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर मुंबई नजीकच्या मीरा रोड (Meera Road) येथील पूनम सोसायटीमध्ये (Poonam Society)

Kalyan Murder Case : कल्याण हादरलं! रविवारी एकत्र सिनेमा, सोमवारी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; बापानंच विवाहित मुलीची हत्या केली?

Kalyan : कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात एका पित्यानेच आपल्या पोटच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार

Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला

Dombivli Marriage News : कोर्ट मॅरेजनंतर घरच्यांनी लग्न लावून देण्याचं दिलं आश्वासन; दुसऱ्याच दिवशी नवरी बेपत्ता

डोंबिवली : प्रेमविवाहाला (Love Marriage) कुटुंबियांचा विरोध, घरच्यांच्या नाराजीमुळे दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न करणं,

Dombivli News : डोंबिवलीतील लोढा पलावा क्राऊन सिटीत पोलिसांचा छापा; २५ आफ्रिकन नागरिक ताब्यात

डोंबिवली : नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे (Thane) पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन गरुड ३’ अंतर्गत शनिवारी पहाटे

Mumbai Central Railway Delay : पहाटेच्या पावसामुळे खडवली-टिटवाळा दरम्यान पॉवर कट; मध्य रेल्वेची वाहतूक होती ठप्प, सकाळी ६ नंतर गाड्या सुरू

टिटवाळा : मध्य रेल्वेच्या (Central Railway) खडवली (Khadavli) ते टिटवाळा (Titwala) स्थानकांदरम्यान रविवारी (२४ मे) पहाटे सुमारे ४.३० वाजता