लाखो रुपयांचा खर्च तरी पाणी टंचाई मिटेना

कोल्हेधव वाशियांचा घसा पडला कोरडा


मोखाडा : गाव पाड्यातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतीना वर्षाकाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो.तरीदेखील गाव पाड्यातील पाणी टंचाईची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.त्यामुळे अशा मानवनिर्मित पाणी टंचाईचे चटके गेल्या काही वर्षांपासून कोल्हेधव गावातील नागरिकांना सहन करावे लागत आहेत.



सहा घरांची वस्ती असलेल्या कोल्हेधव गावात जेमतेम तीस ते चाळीस माणसं राहतात येथील नागरिकांना इतर मुलभूत सुविधांची तर वानवा आहेच परंतु त्याही पेक्षा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे यासाठी मागील सात आठ वर्षांत वीस ते पंचवीस लाख रुपयांचा निधी हा केवळ पाणी टंचाई दुर करण्यासाठी खर्च केलेला असताना ही येथील नागरिकांना महिन्याभरापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.महत्वाचे म्हणजे कोल्हेधव गाव मोखाडा तालुक्यात येत असून पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील बलद्याचापाडा मार्गाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव, काकडवळण या मार्गाने जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर चे अंतर पार करून कोल्हेधव गावाला पाणी पुरविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.परंतू टॅंकर ये जा करण्यासाठी संपूर्ण दिवस जाणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी सूचना पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे कर्मचारी यांनी बोलताना सांगितले आहे.मुळात कोल्हेधव गावात यायला जायला पूल बांधला असता तर शासनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले असते.परंतू लोकसंख्येचा आकडा लक्षात घेता या पाड्याला पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्यास अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.यामुळे शासनाची नियमावलीच लोकांच्या जीवांवर उठली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


ग्रामपंचायतीकडून नवीन विहीर बांधणे,जुन्या विहीरीची दुरुस्ती करणे यासह सौरऊर्जेवर चालणारी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे अशा पाणी पुरवठ्याच्या योजनांवर लाखो रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झालेला असताना ही पाणी टंचाई संपायला तयार नाही. त्यामुळे खर्च केलेला निधी नेमका जातो कुठे? याचा प्रशासनाने शोध घेतला पाहिजे.


ग्रामपंचायतकडून विहीरीची दुरुस्ती करून येत्या दोन तीन दिवसांत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली जाईल. - जी. लष्करी, ग्रामपंचायत अधिकारी आसे

Comments
Add Comment

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण

Thane Accident : शहापूर-मुरबाड मार्गावर मिनी बसचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, तीन प्रवासी गंभीर जखमी

ठाणे : शहापूर-मुरबाड (Shahapur-Murbad) मार्गावरील शेंद्रुण परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मिनी बस (Mini Bus Accident)

Raid on Illegal Mixed Hydrocarbon Oil : ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

- नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात

Kalyan Accident : पत्नीला माहेरी सोडून परतताना काळाचा घाला! घरापासून काही अंतरावर रील स्टार प्रेम भाटीचा अपघाती मृत्यू

Kalyan Accident : कल्याण : कल्याण (Kalyan) शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला माहेरी

Kalyan ST Bus : आगार स्थलांतरामुळे एसटी प्रवाशांचे हाल; सहा महिन्यांपासून विठ्ठलवाडीपर्यंतच प्रवास

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानेच परिवर्तन पॅनलची स्थापना : कपिल पाटील

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानेच खोडसाळपणे आरोप करण्यापेक्षा रवींद्र चव्हाणांबरोबर थेट चर्चा