Mumbai-Goa highway : आमदार निलेश राणेंनी घेतला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा

मुंबई : मुंबई -गोवा महामार्गाच्या(Mumbai-Goa highway) कामाला गती द्या तसेच काम लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी अधिकान्यांना दिल्या आहेत. आमदार राणे चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांनी महामार्गाच्या कामाच्या आढावा घेतला.मुंबई – गोवा महार्मागाच्या(Mumbai-Goa highway) चौपदरीकरणाचे काम गेल्या १२ ते १५ वर्षांपासून रखडले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने महामार्गाबाबत वारंवार नव्या डेडलाईन दिल्या जात आहेत.


पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे महामार्गाची रखडलेली काम लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर असताना उपविभागीय अधिकान्यांना दिल्या. डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला आणि खुणेकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या आढावा बैठकीत दिले आहे. यावेळी स्थानिक राजकीय नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जानेवारी २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती.


गोवा महामार्गाच्या(Mumbai-Goa highway) कामाला गती द्या तसेच काम लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी अधिकान्यांना दिल्या आहेत. आमदार राणे चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांनी महामार्गाच्या कामाच्या आढावा घेतला.मुंबई – गोवा महार्मागाच्या(Mumbai-Goa highway) चौपदरीकरणाचे काम गेल्या १२ ते १५ वर्षांपासून रखडले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने महामार्गाबाबत वारंवार नव्या डेडलाईन दिल्या जात आहेत.


पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे महामार्गाची रखडलेली काम लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर असताना उपविभागीय अधिकान्यांना दिल्या. डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला आणि खुणेकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या आढावा बैठकीत दिले आहे. यावेळी स्थानिक राजकीय नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जानेवारी २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती.

Comments
Add Comment

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून