IPL 2025: जसप्रीत बुमराह कधी करणार पुनरागमन?

  129

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामाची मुंबई इंडियन्स संघासाठी निराशाजनक सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले असून संघाची सलामी जोडी व गोलंदाजीची धारही कमी दिसत आहे. आता संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल अनिश्चितता निर्माण झाल्याने चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.


जसप्रीत बुमराह १ एप्रिलपर्यंत मुंबई इंडियन्स संघात दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, बुमराहचे आयपीएल २०२५ मध्ये पुनरागमन लांबणीवर पडले आहे. त्याच्या परतण्याची कोणतीही निश्चित तारीख अद्याप ठरलेली नाही.


बुमराहला संघात परतण्यासाठी एप्रिल महिन्याचा मध्य उजाडण्याची शक्यता आहे. याउलट, संघातील दुसरा गोलंदाज आकाशदीप हा १० एप्रिलपर्यंत संघात पुनरागमन करू शकतो, असे समजते आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीवर मोठा परिणाम होत असून, खेळाडू त्याला लवकरात लवकर संघात पाहण्यास उत्सुक आहेत.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे