Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबई क्रिकेट सोडून गोव्याला जाणार

  62

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) वैयक्तिक कारणांमुळे मुंबई क्रिकेट संघ सोडून गोवा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (१ एप्रिल २०२५) त्यांने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहून 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (NOC) मागितले, जे MCA ने मंजूर केले आहे.


या निर्णयामुळे २३ वर्षीय डावखुरा फलंदाज २०२५-२६ हंगामापासून गोव्याकडून खेळेल. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांबा देसाई यांनी पुष्टी केली की जयस्वाल पुढील हंगामापासून गोव्याकडून खेळणार आणि राष्ट्रीय कर्तव्यांपासून मोकळा असताना तो संघाचे नेतृत्वही करू शकतो.



जयस्वालने अखेरचा सामना मुंबईकडून २३-२५ जानेवारी दरम्यान जम्मू आणि काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफी ग्रुप अ लीग फेरीच्या सामन्यात जानेवारी २०२५ मध्ये खेळला होता. बीसीसीआयने सर्व भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळावे या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी केल्यानंतर जयस्वालने शेवटचा सामना खेळला होता.


त्या सामन्यात, जयस्वालने रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामात एकमेव खेळ केला होता, त्याने ४ आणि २६ धावा केल्या होत्या या वेळी दुसऱ्यांदा मुंबईचा जम्मू आणि काश्मीरकडून पाच विकेट्सने पराभव झाला होता.


जयस्वालचा हा निर्णय मुंबई क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे, कारण तो अलिकडच्या काळात गोव्यात स्थलांतरित होणारा अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड यांच्यानंतर तिसरा प्रमुख खेळाडू आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र