Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबई क्रिकेट सोडून गोव्याला जाणार

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) वैयक्तिक कारणांमुळे मुंबई क्रिकेट संघ सोडून गोवा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (१ एप्रिल २०२५) त्यांने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहून 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (NOC) मागितले, जे MCA ने मंजूर केले आहे.


या निर्णयामुळे २३ वर्षीय डावखुरा फलंदाज २०२५-२६ हंगामापासून गोव्याकडून खेळेल. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांबा देसाई यांनी पुष्टी केली की जयस्वाल पुढील हंगामापासून गोव्याकडून खेळणार आणि राष्ट्रीय कर्तव्यांपासून मोकळा असताना तो संघाचे नेतृत्वही करू शकतो.



जयस्वालने अखेरचा सामना मुंबईकडून २३-२५ जानेवारी दरम्यान जम्मू आणि काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफी ग्रुप अ लीग फेरीच्या सामन्यात जानेवारी २०२५ मध्ये खेळला होता. बीसीसीआयने सर्व भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळावे या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी केल्यानंतर जयस्वालने शेवटचा सामना खेळला होता.


त्या सामन्यात, जयस्वालने रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामात एकमेव खेळ केला होता, त्याने ४ आणि २६ धावा केल्या होत्या या वेळी दुसऱ्यांदा मुंबईचा जम्मू आणि काश्मीरकडून पाच विकेट्सने पराभव झाला होता.


जयस्वालचा हा निर्णय मुंबई क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे, कारण तो अलिकडच्या काळात गोव्यात स्थलांतरित होणारा अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड यांच्यानंतर तिसरा प्रमुख खेळाडू आहे.

Comments
Add Comment

ICC Womens World Cup 2025 : थरार निश्चित! ICC महिला विश्वचषक उपांत्य फेरीसाठी ४ 'बलाढ्य' संघ फिक्स; फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाचा सामना कुणासोबत?

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार आता संपला आहे. साखळी

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ICU मध्ये दाखल; डॉक्टरांनी सांगितले अंतर्गत रक्तस्रावाचे कारण!

सिडनी : भारतीय वनडे क्रिकेट संघाचा (Indian ODI Team) उपकर्णधार (Vice-Captain) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

IND vs BAN : क्रूर पाऊस! ICC महिला विश्वचषकात भारताचा विजय हुकला; बांगलादेश पराभवापासून वाचला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना अखेर पावसामुळे

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर