Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबई क्रिकेट सोडून गोव्याला जाणार

  47

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) वैयक्तिक कारणांमुळे मुंबई क्रिकेट संघ सोडून गोवा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (१ एप्रिल २०२५) त्यांने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहून 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (NOC) मागितले, जे MCA ने मंजूर केले आहे.


या निर्णयामुळे २३ वर्षीय डावखुरा फलंदाज २०२५-२६ हंगामापासून गोव्याकडून खेळेल. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांबा देसाई यांनी पुष्टी केली की जयस्वाल पुढील हंगामापासून गोव्याकडून खेळणार आणि राष्ट्रीय कर्तव्यांपासून मोकळा असताना तो संघाचे नेतृत्वही करू शकतो.



जयस्वालने अखेरचा सामना मुंबईकडून २३-२५ जानेवारी दरम्यान जम्मू आणि काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफी ग्रुप अ लीग फेरीच्या सामन्यात जानेवारी २०२५ मध्ये खेळला होता. बीसीसीआयने सर्व भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळावे या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी केल्यानंतर जयस्वालने शेवटचा सामना खेळला होता.


त्या सामन्यात, जयस्वालने रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामात एकमेव खेळ केला होता, त्याने ४ आणि २६ धावा केल्या होत्या या वेळी दुसऱ्यांदा मुंबईचा जम्मू आणि काश्मीरकडून पाच विकेट्सने पराभव झाला होता.


जयस्वालचा हा निर्णय मुंबई क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे, कारण तो अलिकडच्या काळात गोव्यात स्थलांतरित होणारा अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड यांच्यानंतर तिसरा प्रमुख खेळाडू आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार