Waqf Amendment Bill 2025 : वक्फ बोर्डाच्या भूमिकेवरून उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना डिवचलं!

Share

मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सुधारित वक्फ विधेयक सादर केले. सध्या लोकसभा सभागृहात या विधेयकावर चर्चा सुरू असून, सत्ताधारी याचे समर्थन करत आहेत. तर, विरोधक याला विरोध करत आहेत. याचबरोबर या वक्फ दुरूस्ती विधेयकावरून सभागृहाबाहेरही प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्फ विधेयकावरील भूमिकेवरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

 

काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

वक्फ दुरूस्ती विधेयकावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या फायद्याचे आहे. त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे.” पुढे पत्रकारांनी या विधेयकावरील ठाकरे गटाच्या भूमिकेचा उल्लेख करतात एकनाथ शिंदे म्हणाले, “हे बघा, असली पळपूटी भूमिका कशाला घ्यायची. स्पष्ट भूमिका घ्या ना. तुम्ही गोष्टी जेव्हा फायद्याच्या असतात तेव्हा धरता आणि तोट्याच्या असतील तेव्हा सोडतात. विधानसभा निवडणुकीत ते १०० जागा लढले आणि २० जिंकले.

इथून पुढे होणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता बघायचे आहे की, ते बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका घेऊन पुढे जातात की, राहुल गांधी सांगतील तसे करणार.” दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recent Posts

एसटी कर्मचाऱ्यांच्या दुखण्यावर तोडगा कधी निघणार?

राज्य सरकारमध्ये कार्यरत असणाऱ्या मंत्रालयीन तसेच विविध शासकीय आस्थापनेचे कर्मचारी, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी…

18 minutes ago

‘कॅश फॉर स्कूल’ जॉब घोटाळा

ज्येष्ठ विश्लेषक : अभय गोखले पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा…

48 minutes ago

ज्येष्ठ नागरिक सायबरच्या विळख्यात…

वृषाली आठल्ये : मुंबई ग्राहक पंचायत ७५ वर्षांच्या एका निवृत्त कर्नल यांना एका सायबर गुन्हेगारांनी…

1 hour ago

RCB vs DC, IPL 2025: दिल्लीचा विजयरथ कायम, आरसीबीला त्यांच्याच घरात हरवले, राहुलची जबरदस्त खेळी

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये दिल्लीचा विजयरथ कायम आहे. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स…

3 hours ago

हापूस आंब्याच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट

मुंबईत ७५ हजार पेटी हापूसची आवक मुंबई(प्रतिनिधी) : हवामान बदल, नैसर्गिक आपत्तींमुळे कोकणातील हापूस आंब्याच्या…

3 hours ago

वाढदिवस साजरा होताना नेहमीच नव्या जबाबदारीची जाणीव होते : खासदार नारायण राणे

उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आ. शेखर…

4 hours ago