तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासन राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक सक्षमतेने आणि प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे, याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या संबंधीच्या निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधींना सह्याद्री अतिथीगृह येथे देण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय समुदायाच्या शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यासंदर्भातील विविध योजना राबवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे तृतीयपंथीय समुदायाला अधिक सक्षम आणि न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल, तसेच त्यांचे हक्क आणि कल्याण अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करता येईल.

सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले, सन २०१८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाच्या संरचनेत बदल करून सुधारित स्वरूपात नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १३ अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द करून त्याऐवजी नव्या सदस्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी तृतीयपंथीयांसाठीचे धोरण – २०२४, ११ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आले होते. या धोरणानुसार राज्यस्तरीय मंडळाच्या संरचनेत सुधारणा करणे आवश्यक होते.

नव्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचे अध्यक्ष असतील. तसेच समाज कल्याण आयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत. तृतीयपंथीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशा अशासकीय सदस्यांचाही मंडळात समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Schools Open : राज्यातील सर्व शाळा गुरुवारी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या