Maharashtra News : भर उन्हाळ्यात पावसाच्या सरींनी दिला अमरावतीकरांना दिलासा

अमरावती : काही दिवसांपासून असह्य उकाडा अन् अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेल्या अमरावतीकरांना ढगाळ वातावरण व नंतर पडलेल्या पावसाच्या सरी मुळे चांगलाच दिलासा मिळाला. मंगळवारी सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सर्वत्र अवकाळी पाऊस पडेल की काय? असे वाटत होते.रात्री उशिरा जिल्ह्यातील हवेत गारवा निर्माण झाला असून रोज कडक उन्हाचा अनुभव घेणाऱ्या शहरवासीयांना यातून सुटका मिळाली.



मार्चच्या सुरवातीपासून शहरातील कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान होते. सकाळी ९ वाजल्यापासून वातावरणात उष्मा वाढत होता. सायंकाळी सहापर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत असल्याचे चित्र आहे. दुपारी उन्हाच्या झळा असह्य वाटत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ घटल्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळेच दुपारी शहरातील बहुतांश रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, रुमाल, छत्री तसेच स्कार्फचा वापर करीत आहेत. घरातील पंखे, कुलर रात्रंदिवस सुरू ठेवावे लागत आहेत. तीव्र उन्हाच्या झळांनी अवघ्या शहराला घाम फुटलेला असताना मंगळवारी (१ एप्रिल) मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते व रात्रीच्या सुमारास हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली.

Comments
Add Comment

Moshi incident : पुणे जिल्ह्यातील मोशी दुर्घटनेच्या ठिकाणी ७२ तासांनंतरही बचावकार्य सुरू

पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला असून दुर्घटनाग्रस्त

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Chandrashekhar Bawankule : परप्रांतीयांच्या कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

- विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती; बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झालेल्या जमिनी सरकारजमा होणार मुंबई :

kharif pik vima : खरीप २०२६ पीक विम्यासाठी नवे नियम लागू; अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी या 5 गोष्टी जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा योजनेत (Crop Insurance) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदा पीक विमा (Pik Vima)

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन