कसा कराल उष्माघातापासून आपला बचाव? या आहेत टिप्स… 

ठाणे : सध्या राज्यामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले असून दिवसा काम करताना अनेक लोकांना अति उष्णतेमुळे त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पारा हा नॉर्मल तापमानापेक्षा वाढला असून त्याचा त्रास लोकांना जाणवत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी लोकांना उष्माघातापासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी लोकांना उष्माघाताची लक्षणे ओळखावीत व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यामध्ये सतत पाणी पिणे आवश्यक असून कडक उन्हामध्ये गरज असल्यासच घरातून बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल?


• कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.

• अनवाणी बाहेर जाऊ नका.

• लहान मुले किंवा पाळीव प्राणी यांना उन्हात पार्क केलेल्या गाडीत सोडू नका.

• दुपारच्या वेळेस बाहेर काम करण शक्यतो टाळा.

• स्वत:ला हायड्रेटेड ठेवा.

• सैल सूती कपडे घाला.

• चहा, कॉफी, दारू पिणे टाळा.

• कडक उन्हाच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा.

• ओरल रिहायड्रेशन सोलूशन वापरा. लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यासारखे घरगुती पेय प्यावे.

• डोके झाकून ठेवा- थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल, यासारख्या पारंपारिक साधनांचा वापर करावा. 

जेष्ठ नागरिकांमध्ये उष्माघाताची लक्षणे 

• दिशाहीनता, भ्रम, गोंधळ, चिडचिड, झटका येणे किंवा कोमात जाणे.

• गरम लाल, कोरडी त्वचा.

• मुख्य शरीराचे तापमान ४० डिग्री से. पेक्षा अधिक किंवा १०४ डिग्री एफ.

• स्नायू कमकुवत किंवा पेटके आल्यासारखे वाटणे.

• मळमळ किंवा उलटी होणे.

• हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, श्वास लागणे.

मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे 

• भूक न लागणे, अत्याधिक चिडचिड होणे.

• लघवी ला कमी होणे.

• डोळ्यासमोर अंधुकपणा जाणवणे.

• सुस्ती, मानसिक भ्रम सारखी परिस्थिती 

• झटका येणे.

• कोणत्याही ठिकाणावरून रक्त वाहने.

संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी

लहान अर्भक, लहान मुले, गर्भवती महिला, घराबाहेर काम करणाऱ्या व्यक्ती, ज्यांना मानसिक आजार आहे आशा व्यक्ती, शारीरिक दृष्ट्या आजारी, विशेषतः उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींची जास्त काळजी घेण गरजेच आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी

• एकटे राहणाऱ्या वयोरुद्ध व्यक्ती किंवा आजारी लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा.

• शरिराला थंडावा देण्यासाठी पंखे आणि ओल्या कपड्यांचा वापर करावा.

• घरातील वातावरण थंड असावे. 

घराबाहेर आणि घरामध्ये अतिउष्णतेच्या संपर्कामुळे हिटस्ट्रेस निर्माण होवू शकतो. ज्यामुळे उष्माघाताशी संबंधित आजार निर्माण होवू शकतात. तरी उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास नजिकच्या दवाखान्यात उपचारासाठी जाण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभाग ठाणे च्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

Health: वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांनी फिट राहण्यासाठी जरूर खा या ७ गोष्टी

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना चाळीशीनंतर आरोग्याच्या अनेक

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

Health : डाएटमध्ये सामील करा हे ड्रायफ्रुट्स, होणार नाही लिव्हरची समस्या

मुंबई : यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडतो. त्याचे आरोग्य

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.

Health: प्रोटीनचा उत्तम स्रोत! 'या' ५ ड्रायफ्रूट्समुळे मिळेल भरपूर प्रोटीन

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रोटीन