Dhananjay Munde : दादांच्या दौऱ्याकडे पाठ, पण 'फॅशन शो'ला मात्र हजेरी! आजारपणाचे सोंग कशासाठी?

  53

धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण


मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कोणत्याही पक्षाच्या बैठकीला किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला हजर राहिलेले दिसले नाहीत. आज उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडे उपस्थित असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र ते अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या ठिकाणी असलेल्या वास्तविकतेबाबत चर्चांना उधाण आले.



धनंजय मुंडे आजारी की कुठे?


धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल माहिती दिली. अजित पवार म्हणाले, "धनंजय मुंडे यांनी मला कॉल करून कळवले की, त्यांची तब्येत बरी नाही आणि ते उपचारासाठी दवाखान्यात दाखल होत आहेत, त्यामुळे ते दौऱ्यावर येऊ शकत नाहीत."





याचबरोबर, पंकजा मुंडे यांनीही हाच दावा केला की, धनंजय मुंडे यांची तब्येत बरेच दिवस ठीक नाही. मात्र याचदरम्यान मुंबईतील एका फॅशन शोमध्ये धनंजय मुंडे सहभागी झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने चर्चांना नवा रंग मिळाला.



फॅशन शोमध्ये हजेरीने संभ्रम वाढला


धनंजय मुंडे यांनी आज सकाळी ट्विटरवरून माहिती दिली होती की, त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते मुंबईत उपचार घेत आहेत आणि बीडमधील कार्यक्रमांना हजर राहू शकणार नाहीत. त्यांनी पक्ष नेतृत्वालाही याची पूर्वसूचना दिली होती.


मात्र याच दिवशी रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या फॅशन शोमध्ये ते उपस्थित असल्याचे समोर आले.


या फॅशन शोमध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे सहभागी झाली होती. त्यामुळे एकीकडे आजारी असल्याचा दावा आणि दुसरीकडे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहून फॅशन शोमध्ये हजेरी, यामुळे धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक