वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत सादर होण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी होणार सादर


नवी दिल्ली: वक्फ संशोधन विधेयक संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करणार आहे. भाजपाने एनडीएच्या सहयोगी पक्षांना याची माहिती दिली आहे. सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सहयोगी पक्षांच्या नेत्यांना फोन करून त्यांना माहिती दिली असून, समर्थन मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 एप्रिलला संपुष्टात येणार आहे. यापुढे, या विधेयकाला कायदा बनवण्यासाठी संसदेच्या दोन्ही सदनांत (लोकसभा आणि राज्यसभा) पास करणे आवश्यक आहे. या विधेयकावर अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज, सोमवारी सांगितले की विधेयक सादर करण्याची वेळ संसदेच्या बैठकीनंतर ठरवली जाईल. हे विधेयक लवकरात लवकर पारित व्हावे अशी इच्छा आहे. केंद्र सरकारने संकेत दिला की उद्या,मंगळवारी विविध पक्षांच्या नेत्यांशी विधेयक सादर करण्याच्या वेळेवर चर्चा केली जाईल. त्यानंतर बुधवारी ते लोकसभेत सादर होऊ शकते.

या बिलाच्या अनुषंगाने किरेन रिजिजू म्हणाले की, काही पक्ष आणि संघटना मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहेत. विधेयकासंदर्भात हे लोक खोटे सांगत आहेत. हे विधेयक मुसलमानांच्या हितासाठी आहे. ईदेच्या वेळी मुसलमानांना काळ्या पट्ट्या बांधून विधेयकाचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करणे हे योग्य नाही. अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नागरिकता (संशोधन) कायद्याविरोधात देखील असेच मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी प्रश्न केला, या कायद्याच्या आल्यानंतर एकही मुसलमान नागरिकता गमावला आहे का? विरोधी पक्षांना आग्रह केला आहे की ते विधेयक चांगले वाचून मग सरकारशी संवाद साधा असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी