वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत सादर होण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी होणार सादर


नवी दिल्ली: वक्फ संशोधन विधेयक संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करणार आहे. भाजपाने एनडीएच्या सहयोगी पक्षांना याची माहिती दिली आहे. सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सहयोगी पक्षांच्या नेत्यांना फोन करून त्यांना माहिती दिली असून, समर्थन मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 एप्रिलला संपुष्टात येणार आहे. यापुढे, या विधेयकाला कायदा बनवण्यासाठी संसदेच्या दोन्ही सदनांत (लोकसभा आणि राज्यसभा) पास करणे आवश्यक आहे. या विधेयकावर अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज, सोमवारी सांगितले की विधेयक सादर करण्याची वेळ संसदेच्या बैठकीनंतर ठरवली जाईल. हे विधेयक लवकरात लवकर पारित व्हावे अशी इच्छा आहे. केंद्र सरकारने संकेत दिला की उद्या,मंगळवारी विविध पक्षांच्या नेत्यांशी विधेयक सादर करण्याच्या वेळेवर चर्चा केली जाईल. त्यानंतर बुधवारी ते लोकसभेत सादर होऊ शकते.

या बिलाच्या अनुषंगाने किरेन रिजिजू म्हणाले की, काही पक्ष आणि संघटना मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहेत. विधेयकासंदर्भात हे लोक खोटे सांगत आहेत. हे विधेयक मुसलमानांच्या हितासाठी आहे. ईदेच्या वेळी मुसलमानांना काळ्या पट्ट्या बांधून विधेयकाचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करणे हे योग्य नाही. अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नागरिकता (संशोधन) कायद्याविरोधात देखील असेच मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी प्रश्न केला, या कायद्याच्या आल्यानंतर एकही मुसलमान नागरिकता गमावला आहे का? विरोधी पक्षांना आग्रह केला आहे की ते विधेयक चांगले वाचून मग सरकारशी संवाद साधा असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम