वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत सादर होण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी होणार सादर


नवी दिल्ली: वक्फ संशोधन विधेयक संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करणार आहे. भाजपाने एनडीएच्या सहयोगी पक्षांना याची माहिती दिली आहे. सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सहयोगी पक्षांच्या नेत्यांना फोन करून त्यांना माहिती दिली असून, समर्थन मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 एप्रिलला संपुष्टात येणार आहे. यापुढे, या विधेयकाला कायदा बनवण्यासाठी संसदेच्या दोन्ही सदनांत (लोकसभा आणि राज्यसभा) पास करणे आवश्यक आहे. या विधेयकावर अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज, सोमवारी सांगितले की विधेयक सादर करण्याची वेळ संसदेच्या बैठकीनंतर ठरवली जाईल. हे विधेयक लवकरात लवकर पारित व्हावे अशी इच्छा आहे. केंद्र सरकारने संकेत दिला की उद्या,मंगळवारी विविध पक्षांच्या नेत्यांशी विधेयक सादर करण्याच्या वेळेवर चर्चा केली जाईल. त्यानंतर बुधवारी ते लोकसभेत सादर होऊ शकते.

या बिलाच्या अनुषंगाने किरेन रिजिजू म्हणाले की, काही पक्ष आणि संघटना मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहेत. विधेयकासंदर्भात हे लोक खोटे सांगत आहेत. हे विधेयक मुसलमानांच्या हितासाठी आहे. ईदेच्या वेळी मुसलमानांना काळ्या पट्ट्या बांधून विधेयकाचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करणे हे योग्य नाही. अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नागरिकता (संशोधन) कायद्याविरोधात देखील असेच मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी प्रश्न केला, या कायद्याच्या आल्यानंतर एकही मुसलमान नागरिकता गमावला आहे का? विरोधी पक्षांना आग्रह केला आहे की ते विधेयक चांगले वाचून मग सरकारशी संवाद साधा असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट