वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत सादर होण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी होणार सादर


नवी दिल्ली: वक्फ संशोधन विधेयक संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करणार आहे. भाजपाने एनडीएच्या सहयोगी पक्षांना याची माहिती दिली आहे. सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सहयोगी पक्षांच्या नेत्यांना फोन करून त्यांना माहिती दिली असून, समर्थन मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 एप्रिलला संपुष्टात येणार आहे. यापुढे, या विधेयकाला कायदा बनवण्यासाठी संसदेच्या दोन्ही सदनांत (लोकसभा आणि राज्यसभा) पास करणे आवश्यक आहे. या विधेयकावर अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज, सोमवारी सांगितले की विधेयक सादर करण्याची वेळ संसदेच्या बैठकीनंतर ठरवली जाईल. हे विधेयक लवकरात लवकर पारित व्हावे अशी इच्छा आहे. केंद्र सरकारने संकेत दिला की उद्या,मंगळवारी विविध पक्षांच्या नेत्यांशी विधेयक सादर करण्याच्या वेळेवर चर्चा केली जाईल. त्यानंतर बुधवारी ते लोकसभेत सादर होऊ शकते.

या बिलाच्या अनुषंगाने किरेन रिजिजू म्हणाले की, काही पक्ष आणि संघटना मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहेत. विधेयकासंदर्भात हे लोक खोटे सांगत आहेत. हे विधेयक मुसलमानांच्या हितासाठी आहे. ईदेच्या वेळी मुसलमानांना काळ्या पट्ट्या बांधून विधेयकाचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करणे हे योग्य नाही. अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नागरिकता (संशोधन) कायद्याविरोधात देखील असेच मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी प्रश्न केला, या कायद्याच्या आल्यानंतर एकही मुसलमान नागरिकता गमावला आहे का? विरोधी पक्षांना आग्रह केला आहे की ते विधेयक चांगले वाचून मग सरकारशी संवाद साधा असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.