वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत सादर होण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी होणार सादर


नवी दिल्ली: वक्फ संशोधन विधेयक संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करणार आहे. भाजपाने एनडीएच्या सहयोगी पक्षांना याची माहिती दिली आहे. सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सहयोगी पक्षांच्या नेत्यांना फोन करून त्यांना माहिती दिली असून, समर्थन मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 एप्रिलला संपुष्टात येणार आहे. यापुढे, या विधेयकाला कायदा बनवण्यासाठी संसदेच्या दोन्ही सदनांत (लोकसभा आणि राज्यसभा) पास करणे आवश्यक आहे. या विधेयकावर अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज, सोमवारी सांगितले की विधेयक सादर करण्याची वेळ संसदेच्या बैठकीनंतर ठरवली जाईल. हे विधेयक लवकरात लवकर पारित व्हावे अशी इच्छा आहे. केंद्र सरकारने संकेत दिला की उद्या,मंगळवारी विविध पक्षांच्या नेत्यांशी विधेयक सादर करण्याच्या वेळेवर चर्चा केली जाईल. त्यानंतर बुधवारी ते लोकसभेत सादर होऊ शकते.

या बिलाच्या अनुषंगाने किरेन रिजिजू म्हणाले की, काही पक्ष आणि संघटना मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहेत. विधेयकासंदर्भात हे लोक खोटे सांगत आहेत. हे विधेयक मुसलमानांच्या हितासाठी आहे. ईदेच्या वेळी मुसलमानांना काळ्या पट्ट्या बांधून विधेयकाचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करणे हे योग्य नाही. अल्पसंख्यक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नागरिकता (संशोधन) कायद्याविरोधात देखील असेच मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी प्रश्न केला, या कायद्याच्या आल्यानंतर एकही मुसलमान नागरिकता गमावला आहे का? विरोधी पक्षांना आग्रह केला आहे की ते विधेयक चांगले वाचून मग सरकारशी संवाद साधा असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन