Weather updates : मुंबई ठाण्यासह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ मार्च २०२५ रोजी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथ्यांवर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच १ एप्रिल २०२५ रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



सध्या अनेक भागांत ढगाळ वातावरण असून, उष्णतेची तीव्रता वाढली आहे. कोकणातील शेतकरी विशेषतः आंबा, काजू आणि कडधान्य उत्पादकांना संभाव्य पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना पिके व काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


वादळी वाऱ्याचा फटका बसू नये म्हणून नागरिकांनी तसेच पशुपालकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास