Ajit Pawar : शरद पवारांचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात ?

Share

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले तर शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले. निवडणूक निकालाला पाच महिने पण झाले नाहीत तोच शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे. मतदारसंघातील कामं व्हावी, विकासाची कामं झपाट्याने व्हावी म्हणून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या बदल्यात शरद पवार गटाच्या आमदारांना मतदारसंघांतील प्रत्येकी १०० कोटी रुपयांची विकासकामं प्राधान्याने पूर्ण केली जातील,असं आश्वासन मिळाल्याचं वृत्त आहे. हे आश्वासन मिळाल्यापासून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे समजते.

शरद पवार गटाचे दहा पैकी चार आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. यामुळे अजित पवार आधी सोलापूरमधील आमदारांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिजीत पाटील (माढा), राजू खरे (मोहोळ), उत्तम जानकर (माळशिरस), नारायण पाटील (करमाळा) हे शरद पवार गटाचे चार आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. यामुळे हे चार आमदार आधी गळाला लावण्याचे प्रयत्न अजित पवारांकडून सुरू असल्याचे वृत्त आहे.

पक्षांतरबंदी कायद्याची अडचण टाळायची असल्यास अजित पवारांना शरद पवार गटाचे दहा पैकी किमान सात आमदार स्वतःच्या पक्षात आणणे आवश्यक आहे. सोलापूरचे चार आमदार राष्ट्रवादीत आले तर अजित पवार गटाची बाजू भक्कम होण्यास मदत होणार आहे. यामुळे अजित पवार आधी सोलापूरमधील शरद पवार गटाच्या आमदारांनाच गळाला लावण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago