Ajit Pawar : शरद पवारांचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात ?

  64

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले तर शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले. निवडणूक निकालाला पाच महिने पण झाले नाहीत तोच शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे. मतदारसंघातील कामं व्हावी, विकासाची कामं झपाट्याने व्हावी म्हणून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.



राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या बदल्यात शरद पवार गटाच्या आमदारांना मतदारसंघांतील प्रत्येकी १०० कोटी रुपयांची विकासकामं प्राधान्याने पूर्ण केली जातील,असं आश्वासन मिळाल्याचं वृत्त आहे. हे आश्वासन मिळाल्यापासून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे समजते.



शरद पवार गटाचे दहा पैकी चार आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. यामुळे अजित पवार आधी सोलापूरमधील आमदारांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिजीत पाटील (माढा), राजू खरे (मोहोळ), उत्तम जानकर (माळशिरस), नारायण पाटील (करमाळा) हे शरद पवार गटाचे चार आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. यामुळे हे चार आमदार आधी गळाला लावण्याचे प्रयत्न अजित पवारांकडून सुरू असल्याचे वृत्त आहे.



पक्षांतरबंदी कायद्याची अडचण टाळायची असल्यास अजित पवारांना शरद पवार गटाचे दहा पैकी किमान सात आमदार स्वतःच्या पक्षात आणणे आवश्यक आहे. सोलापूरचे चार आमदार राष्ट्रवादीत आले तर अजित पवार गटाची बाजू भक्कम होण्यास मदत होणार आहे. यामुळे अजित पवार आधी सोलापूरमधील शरद पवार गटाच्या आमदारांनाच गळाला लावण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.
Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला