Ration Card E-KYC : मोफत धान्यासाठी लवकर करा 'हे' काम अन्यथा रेशन कार्ड होईल आजच बंद!

मुंबई : रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. त्यातील एक म्हणजे रेशनवर मिळणार मोफत धान्य. या धान्यामुळे अनेक गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरून निघते. या रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा खर्च कमी होतो. तुमच्या जवळ असलेल्या रेशन दुकानावर जाऊन रेशन कार्ड दाखवून धान्य घेऊ शकतात. यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. या गोष्टी तुम्हाला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतात. मात्र आता काही रेशनधारकांची केवायसी न झाल्यामुळे रेशनकार्ड बंद होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, देशातील कोट्यवधी नागरिक केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे. ही केवायसी करणे अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. यासाठी केंद्र सरकारने अंतिम मुदत दिली होती. परंतु केंद्र सरकारकडून ही मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.




KYC कसे कराल ?


तुमच्या जवळ असलेल्या रेशनच्या दुकानावर जाऊन ही केवायसी तुम्हाला करता येणार आहे. ही केवायसी बायोमेट्रिक पद्धतीची असणारा आहे. बायोमेट्रिक पद्धतीची केवायसी न केल्यास तुमचं रेशन कार्ड आजच बंद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : देशाच्या हवामानातं अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. काही राज्यात पाऊस, गारपीठ तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर

Rain In Maharashtra : उष्माघातानंतर राज्यासमोर वादळी पावसाचे संकट

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२