Ration Card E-KYC : मोफत धान्यासाठी लवकर करा 'हे' काम अन्यथा रेशन कार्ड होईल आजच बंद!

मुंबई : रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. त्यातील एक म्हणजे रेशनवर मिळणार मोफत धान्य. या धान्यामुळे अनेक गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरून निघते. या रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा खर्च कमी होतो. तुमच्या जवळ असलेल्या रेशन दुकानावर जाऊन रेशन कार्ड दाखवून धान्य घेऊ शकतात. यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. या गोष्टी तुम्हाला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतात. मात्र आता काही रेशनधारकांची केवायसी न झाल्यामुळे रेशनकार्ड बंद होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, देशातील कोट्यवधी नागरिक केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे. ही केवायसी करणे अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. यासाठी केंद्र सरकारने अंतिम मुदत दिली होती. परंतु केंद्र सरकारकडून ही मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.




KYC कसे कराल ?


तुमच्या जवळ असलेल्या रेशनच्या दुकानावर जाऊन ही केवायसी तुम्हाला करता येणार आहे. ही केवायसी बायोमेट्रिक पद्धतीची असणारा आहे. बायोमेट्रिक पद्धतीची केवायसी न केल्यास तुमचं रेशन कार्ड आजच बंद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Free School Bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारकडून १७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या

Western Railway Food and Water Safety : पश्चिम रेल्वेची अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी कडक तपासणी; 98 टक्के अन्न नमुने, तर 99.87 टक्के पाणी नमुने सुरक्षित

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा

BMC Pedestrian First Initiative : दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी केली पाहणी

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका मुबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती