Vande Bharat Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरमध्ये धावणार पहिली वंदे भारत ट्रेन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. येत्या १९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा येथून हिरवा झेंडा दाखवणार असल्याची बातमी समोर आली आहे .


यावेळी २७२ किमी च्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाच्या पूर्णत्वाचीदेखील घोषणा करण्यात येणार आहे. जम्मू-कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीला कटराहून चालवली जाईल, कारण जम्मू रेल्वे स्थानकाचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. पंतप्रधान १९ एप्रिल रोजी उधमपूरला येणार आहेत. यावेळी ते जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलाला भेट देतील आणि त्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते कटराहून वंदे भारत ट्रेनला झेंडा दाखवतील. या उद्घाटनामुळे काश्मीरसाठी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार आहे. सध्या केवळ संगलदान-बारामुल्ला आणि कटरा ते देशभरातील विविध स्थळांदरम्यान रेल्वे सेवा कार्यरत आहेत.



या प्रकल्पात ३८ बोगदे असून, त्यांची एकूण लांबी ११९ किलोमीटर आहे. यातील टनेल टी-49 हा सर्वात लांब बोगदा असून, त्याची लांबी १२.७५ किलोमीटर आहे. हा देशातील सर्वात लांब परिवहन बोगदा आहे. प्रकल्पात ९२७ पूल असून, त्यांची एकत्रित लांबी १३ किलोमीटर आहे. यामध्ये आयकॉनिक चिनाब पूल देखील आहे, जो १३१५ मीटर लांब, ४६७ मीटर कमान असलेला आणि नदीपात्राच्या ३५९ मीटर उंचीवर असलेला आहे. हा आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असून, जगातील सर्वात उंच कमानी रेल्वे पूल म्हणून ओळखला जाईल.


याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रेल्वे प्रकल्प गेल्या महिन्यात पूर्ण झाला असून, कटरा-बारामुल्ला मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी जानेवारीमध्ये कटरा-काश्मीर दरम्यान ट्रेन सेवेची मंजुरी दिली होती.वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू-श्रीनगरमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि हा भाग एका आधुनिक व प्रभावी रेल्वे सेवेशी जोडला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या