sanoj mishra : महाकुंभातील 'व्हायरल गर्ल' मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक

नवी दिल्ली : महाकुंभमधून व्हायरल झालेल्या मोनालिसाला सिनेमात काम करण्याची ऑफर देणारा दिग्दर्सक सनोज मिश्राला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर, त्याला दिल्लीच्या नबी करीम पोलिस ठाण्याने अटक केली.


सनोज मिश्रा यांना ३० मार्च २०२४ रोजी दिल्ली पोलिसांनी गुप्तचर माहिती गोळा केल्यानंतर आणि तांत्रिक देखरेखीनंतर अटक केली. ही अटक गाझियाबादमध्ये झाली, त्यानंतर सनोज मिश्रा यांना नबी करीम पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले. २८ वर्षीय महिलेने दिग्दर्शकावर आरोप केला आहे की, "सनोज यांनी तिच्यावर चार वर्षे बलात्कार केला. चित्रपट अभिनेत्री बनण्याची आकांक्षा असलेल्या महिलेने दावा केला की, ती या काळात मुंबईत मिश्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. मिश्राने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप देखील संबंधित महिलेने दिग्दर्शकावर केला आहे.



पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सनोज मिश्रावर लग्नाचे वचन न पाळल्याचा आरोपही केला आहे. दिल्ली पोलिसांच्या निवेदनानुसार, ६ मार्च २०२४ रोजी बलात्कार, हल्ला, गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि धमक्या देणे यासारख्या अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.'महाकुंभ २०२५' दरम्यान व्हायरल झालेल्या मोनालिसाला सनोज मिश्रा यांनी त्यांचा चित्रपट ऑफर केला. या घोषणेनंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. दिग्दर्शकाविरुद्धचे पूर्वीचे आरोपही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हायलाइट झाले आणि त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती