Apple : डेटा गोपनीयता प्रकरणात अ‍ॅपलला १५ कोटी युरोपेक्षा अधिकचा दंड

नवी दिल्ली : आयफोन उत्पादक अ‍ॅपल कंपनी (Apple Company) आपल्या प्रायव्हसी पॉलिसीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आयफोन वापरकर्त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, याच मुद्द्यावर (data privacy case) आता अ‍ॅपल वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, फ्रान्सच्या स्पर्धा नियामकाने कंपनीवर १५ कोटी युरोपेक्षा जास्तीचा दंड ठोठावला आहे.


हे प्रकरण एप्रिल २०२१ ते जुलै २०२३ या काळातील असून, iOS आणि iPad डिव्हाइसेसवर मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या वितरणामध्ये अ‍ॅपलने आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. iPhone मधील ‘अ‍ॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी (ATT)’ हे टूल वापरकर्त्यांना त्यांच्या डेटाच्या संकलनासाठी संमती देण्याची किंवा नाकारण्याची सुविधा देते. परंतु, हेच टूल अ‍ॅपलच्या स्वतःच्या प्रायव्हसी धोरणाच्या विरोधात कार्यरत असल्याचे फ्रान्सच्या नियामकांचे म्हणणे आहे.



स्पर्धा नियामकाने अ‍ॅपलला ATT मध्ये कोणतेही बदल करण्याचे आदेश दिले नाहीत, परंतु त्यांच्या निर्णयात असे नमूद केले की, हे टूल वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या उद्दिष्टांविरोधात जाते. ऑनलाइन जाहिरातदार, प्रकाशक आणि इंटरनेट नेटवर्क्सनी अ‍ॅपलच्या धोरणांवर टीका केली असून, कंपनीने आपल्या बाजारातील शक्तीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


अ‍ॅपलने फ्रेंच नियामकाच्या या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली असून, गोपनीयता नियंत्रण साधनांमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या बदलांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही