उत्तर प्रदेशात ५० वर्षीय महिलेने दिला १४व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेतच प्रसूती

हापूर (उत्तर प्रदेश) : राज्यात लोकसंख्या नियंत्रणाबाबत विविध मोहिमा राबवल्या जात असताना, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एका ५० वर्षीय महिलेने तिच्या १४ व्या बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, ही प्रसूती रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी, रुग्णवाहिकेतच झाली. या घटनेची संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.


हापूरच्या पिलखुवा कोतवाली भागातील बजरंगपुरी मोहल्ल्यात राहणाऱ्या इमामुद्दीन यांच्या पत्नी गुडिया यांनी या बाळाला जन्म दिला आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत.



रुग्णवाहिकेतच प्रसूती


गुरुवारी गुडियाला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला पिलखुवा येथील सरकारी सीएचसी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला हापूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच, रुग्णालयाच्या गेटवर रुग्णवाहिकेतच तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी तिला स्ट्रेचरवर रुग्णालयात हलवले. दुसऱ्या दिवशी, आई आणि बाळाला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला.



कुटुंबाची परिस्थिती आणि वादग्रस्त चर्चा


गुडियाचा मोठा मुलगा २२ वर्षांचा आहे, तर सर्वात धाकटा मुलगा ३ वर्षांचा आहे. विशेष म्हणजे, या कुटुंबात ११ भावंडे असून, तीन मुलांचा आधीच मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनेनंतर कुटुंबीयांनी १४ नव्हे, १२ मुले असल्याचा दावा केला आहे.


गुडियाचा पती इमामुद्दीन मजुरीचे काम करतो, तर मोठा मुलगा साहिल वेल्डिंगचे काम करतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, मोठ्या कुटुंबामुळे मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष देणे कठीण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.



सोशल मीडियावर चर्चेचा विषय


ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या मोहिमा सुरू असतानाही अशा घटना घडत असल्याने, प्रशासन आणि समाजातील अनेक घटक यावर चिंता व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या