अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार

  92

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधारेविषयी 'आयएमडी 'चा अंदाज


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक दिसत आहे. संपूर्ण विदर्भात ४० अंशांच्या पुढे पार गेल्याने धडकी भरेल एवढे तापमान नोंदवले जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानाचा धारा ३८-४० अंशांदरम्यान आहे. दरम्यान भारतीय हवामान केंद्रान गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचे इशारे दिले आहेत. ३१ मार्चला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.


अवकाळी पाऊस कशामुळे येतोय ? हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छतीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांवर आहे. या चक्रीवाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्याची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे. परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ३१ मार्चला 'येलो अलर्ट'


पावसाबाबतचा अंदाज


* १ एमिल ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली,सातारा, पुणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्याना 'येलो अलर्ट', पालघर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, धुळे, जिल्ह्यांना पावसाचा इशारा.


२ एप्रिल- सपूर्ण महाराष्ट्राला पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि
मराठवाड्यात 'यलो' अलर्ट. याबाबत पुणे आयएनडी वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यानी 'एक्स'वर पोस्टही केली आहे.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी