अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधारेविषयी 'आयएमडी 'चा अंदाज


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक दिसत आहे. संपूर्ण विदर्भात ४० अंशांच्या पुढे पार गेल्याने धडकी भरेल एवढे तापमान नोंदवले जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानाचा धारा ३८-४० अंशांदरम्यान आहे. दरम्यान भारतीय हवामान केंद्रान गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचे इशारे दिले आहेत. ३१ मार्चला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.


अवकाळी पाऊस कशामुळे येतोय ? हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छतीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांवर आहे. या चक्रीवाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्याची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे. परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ३१ मार्चला 'येलो अलर्ट'


पावसाबाबतचा अंदाज


* १ एमिल ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली,सातारा, पुणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्याना 'येलो अलर्ट', पालघर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, धुळे, जिल्ह्यांना पावसाचा इशारा.


२ एप्रिल- सपूर्ण महाराष्ट्राला पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि
मराठवाड्यात 'यलो' अलर्ट. याबाबत पुणे आयएनडी वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यानी 'एक्स'वर पोस्टही केली आहे.

Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

...तर गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द होणार?

नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली जाण्याची शक्यता मुंबई :  गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या