कोस्टल रोडवरील सफाईसाठी होणार यांत्रिक झाडूचा वापर

  39

तब्बल ५ यांत्रिक झाडूंची केली जाणार खरेदी


मुंबई : मुंबई महापालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत वाहतुकीसाठी मार्गिका खुल्या करण्यात आल्यानंतर या मार्गावरील स्वच्छतेसाठी यांत्रिक झाडूचा वापर केला जाणार आहे. या मार्गावर मनुष्यबळाचा वापर करून दैनंदिन सफाई करणे शक्य नसल्याने यांत्रिक झाडून या मार्गाची सफाई राखली जाणार आहे.


शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दक्षिणवाहिनी बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) आणि अमरसन्स उद्यान ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका तसेच, उत्तरवाहिनी मरीन ड्राईव्ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.



दरम्यान, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) मार्गावर भरघाव वाहने चालवली जात आहे. त्यामुळे या मार्गावर सफाई राखण्याची विनंती कोस्टल रोड प्रकल्पाच्या प्रमुख अभियंत्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केले आहे. त्यानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाने या मार्गावर मनुष्यबळाचा वापर करून सफाई करणे शक्य नसल्याने यात्रिक झाडूद्वारे याची मार्गाची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ मोठ्या आणि २ छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूचा वापर केला जाणार आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका