NAMO SHETAKARI : 'नमो शेतकरी योजने'चा सहावा हप्ता ३१ मार्चपूर्वी बँक खात्यात जमा होणार

  103

मुंबई : महाराष्ट्रातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची दोन हजार १६९ कोटी रुपये लाभाची रक्कम डीबीटीसंलग्न सक्रिय बँक खात्यात ३१ मार्चपूर्वी जमा करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.



शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबांस (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रतिहप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी ६,००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटीसंलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन सहा हजार रुपयांची भर घालते. आजवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत ५ हप्ते वितरित केले असून ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटी रुपयांचा लाभ बँक खात्यात जमा केला आहे.



पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील योजनेचा १९वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १,९६७.१२ कोटी रुपये निधीचा लाभ वितरित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने पीएम किसान योजनेंतर्गत एकूण ६५ हजार ०४७ लाभार्थींना लाभ दिला आहे.
Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की