NAMO SHETAKARI : 'नमो शेतकरी योजने'चा सहावा हप्ता ३१ मार्चपूर्वी बँक खात्यात जमा होणार

मुंबई : महाराष्ट्रातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची दोन हजार १६९ कोटी रुपये लाभाची रक्कम डीबीटीसंलग्न सक्रिय बँक खात्यात ३१ मार्चपूर्वी जमा करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.



शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबांस (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रतिहप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी ६,००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटीसंलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन सहा हजार रुपयांची भर घालते. आजवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत ५ हप्ते वितरित केले असून ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटी रुपयांचा लाभ बँक खात्यात जमा केला आहे.



पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील योजनेचा १९वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १,९६७.१२ कोटी रुपये निधीचा लाभ वितरित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने पीएम किसान योजनेंतर्गत एकूण ६५ हजार ०४७ लाभार्थींना लाभ दिला आहे.
Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या