NAMO SHETAKARI : 'नमो शेतकरी योजने'चा सहावा हप्ता ३१ मार्चपूर्वी बँक खात्यात जमा होणार

मुंबई : महाराष्ट्रातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची दोन हजार १६९ कोटी रुपये लाभाची रक्कम डीबीटीसंलग्न सक्रिय बँक खात्यात ३१ मार्चपूर्वी जमा करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.



शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबांस (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रतिहप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी ६,००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटीसंलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन सहा हजार रुपयांची भर घालते. आजवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत ५ हप्ते वितरित केले असून ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटी रुपयांचा लाभ बँक खात्यात जमा केला आहे.



पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील योजनेचा १९वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १,९६७.१२ कोटी रुपये निधीचा लाभ वितरित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने पीएम किसान योजनेंतर्गत एकूण ६५ हजार ०४७ लाभार्थींना लाभ दिला आहे.
Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री