IPL 2025: सीएसकेचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ११वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. हा सामना राजस्थानने ६ धावांनी जिंकला. राजस्थानने सीएसकेला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना हे आव्हान गाठता आले नाही.


लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईची सुरूवात खराब झाली. त्यांनी शून्यावर रचिन रवींद्रची विकेट गमावली. यानंतर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने मिळून दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. राहुल सेट झाल्यानंतर त्याने विकेट गमावली. विजय शंकर बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, मोक्याच्या क्षणी ऋतुराज बाद झाला. ऋतुराजने वानिंदु हसरंगाने यशस्वी जायसवालच्या हाती बाद केले. ऋतुराजने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ बॉलमध्ये ६३ धावा केल्या.


तत्पूर्वी, टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ९ बाद १८२ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सची सुरूवात शानदार राहिली. तिसऱ्याच बॉलवर यशस्वी जायसवालची विकेट गेली. यशस्वी ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर नितीश राणाने संजू सॅमसनसोबत मिळून डाव सांभाळला आणि दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. नितीशने २१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. यामुळे त्यांनी पॉवरप्लेमध्ये ७९ धावा केल्या.


संजू सॅमसन बाद झाल्यानंतर नितीश राणाने ताबडतोब बॅटिंग सुरू ठेवली. नितीशच्या तुफानी खेळीचा अंत रविचंद्रन अश्विनने केला. अश्विनने नितीशला एनएस धोनीच्या हाती बाद केले. नितीशने ३६ बॉलमध्ये ८१ धावा केल्या. यात १० चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. नितीश बाद झाल्यानंतर राजस्थान संघाचे एकामागोएक विकेट पडत केले.


कर्णधार रियान परागने काही शॉट्स खेळला. रियानने दोन चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. त्याने २८ बॉलवर ३७ धावा केल्या. यानंतर जोफ्रा आर्चर खाते न खोलता बाद झाला.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या