राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, अनेक ठिकाणी शोभायात्रा

मुंबई: हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. चैत्र महिन्यातील पहिला दिवस हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते.चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. या नववर्षाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे. शिशिर ऋतूतील पानगळ संपलेली असते, सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायचं. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.


यावर्षी राज्यभरात अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य स्वागतयात्रा काढल्या जातात. या शोभायात्रांमध्ये तर तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ढोल-ताशांच्या गजरात, भव्य मिरवणूक काढून नववर्षाचे उत्साहाने स्वागत केले जाते. यावेळी सगळेचजण पारंपारिक वेशभूषा करतात. डोंबिवली, गिरगाव, पुणे तसेच अनेक ठिकाणी ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढली जाते.


गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुर्हूंतांपैकी एक मानला जातो. या दिवशी मोठी खरेदीही केली जाते. सोने-चांदी खरेदीलाही ग्राहकांची मोठी गर्दी असते. नववर्षाच्या मुहूर्तावर सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन व घर घेण्याकडे देखील नागरिकांचा कल दिसून येतो.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री