साई मंदिरात व्ही.आय.पी भाविकांना पहाटे ४ ते ६ दर्शन द्यावे

डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली भूमिका


शिर्डी : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांना व्हीव्हीआयपी च्या दर्शनामुळे वेठीस राहावा लागत असल्याने व्हीव्हीआयपी भाविकांची वेळ तिरुपतीच्या बालाजी देवस्थानच्या धर्तीवर करण्यात करण्यात यावी आणि ती आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ सुजय विखे यांनी शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलतांना केले.



दरम्यान देशातील तिरुपती नंतर नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील व्हीव्हीआयपी भाविकांच्या दर्शन वेळेत बदल कारण्यासंदर्भात माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले की, साई मंदिराचा दर्शन कालावधी ठरलेला आहे, तोपर्यंत सर्वसाधारण भाविक दर्शन घेत राहील. मात्र जे व्ही. व्ही.आय.पी पासद्वारे पैसे देऊन दर्शन घेतात. त्यांच्या दर्शन वेळेत बदल कलेला पाहिजे. ज्याप्रमाणे तिरुपतीला कधीही व्हीआयपी पास काढला तर त्याला दर्शनाची वेळ ही पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत ठरलेली असून याठिकाणी दिवसभरात कधीही दर्शनाचा पास मिळत नाही.त्या पार्श्वभूमीवर आम्ही साईबाबा संस्थानकडे मागणी केली आहे की, तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करून तेथील व्ही.आय.पी भाविकांची पहाटेची दर्शन व्यवस्था कशी अमलात आणता येईल, यासंदर्भात प्रयत्न करावा.


या मागणीमुळे सर्वसामान्य भाविकांचा दर्शनाचा अधिकार कुणीही काढून घेत नसून सर्वसामान्य साईभक्तांचे दर्शन सुरूच राहणार आहे.त्यांच्या दर्शन रांगेत कुठेच व्यत्यय होणार नाही. माझा प्रश्न व्ही.आय.पी दर्शन संदर्भात आहे. जे व्ही.आय.पी आल्याने ज्या रांगा थांबविल्या जातात. सामान्य भाविकाला वेठीस धरले जाते, हा प्रकार होणार नाही. त्यामुळे व्ही.आय.पी भाविकांची वेळ वेगळी ठेवा आणि सर्वसामान्य भाविकांची दर्शन हे पाहिल्या सारखेच सुरु ठेवा आणि व्ही.आय.पी निश्चित करा. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना दर्शनाची अडचण होणार नाही, ही माझी प्रामाणिक भावना असून ती अंमलात आणायचा प्रयत्न करणार असल्याचे माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून