साई मंदिरात व्ही.आय.पी भाविकांना पहाटे ४ ते ६ दर्शन द्यावे

डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली भूमिका


शिर्डी : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांना व्हीव्हीआयपी च्या दर्शनामुळे वेठीस राहावा लागत असल्याने व्हीव्हीआयपी भाविकांची वेळ तिरुपतीच्या बालाजी देवस्थानच्या धर्तीवर करण्यात करण्यात यावी आणि ती आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ सुजय विखे यांनी शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलतांना केले.



दरम्यान देशातील तिरुपती नंतर नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील व्हीव्हीआयपी भाविकांच्या दर्शन वेळेत बदल कारण्यासंदर्भात माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले की, साई मंदिराचा दर्शन कालावधी ठरलेला आहे, तोपर्यंत सर्वसाधारण भाविक दर्शन घेत राहील. मात्र जे व्ही. व्ही.आय.पी पासद्वारे पैसे देऊन दर्शन घेतात. त्यांच्या दर्शन वेळेत बदल कलेला पाहिजे. ज्याप्रमाणे तिरुपतीला कधीही व्हीआयपी पास काढला तर त्याला दर्शनाची वेळ ही पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत ठरलेली असून याठिकाणी दिवसभरात कधीही दर्शनाचा पास मिळत नाही.त्या पार्श्वभूमीवर आम्ही साईबाबा संस्थानकडे मागणी केली आहे की, तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करून तेथील व्ही.आय.पी भाविकांची पहाटेची दर्शन व्यवस्था कशी अमलात आणता येईल, यासंदर्भात प्रयत्न करावा.


या मागणीमुळे सर्वसामान्य भाविकांचा दर्शनाचा अधिकार कुणीही काढून घेत नसून सर्वसामान्य साईभक्तांचे दर्शन सुरूच राहणार आहे.त्यांच्या दर्शन रांगेत कुठेच व्यत्यय होणार नाही. माझा प्रश्न व्ही.आय.पी दर्शन संदर्भात आहे. जे व्ही.आय.पी आल्याने ज्या रांगा थांबविल्या जातात. सामान्य भाविकाला वेठीस धरले जाते, हा प्रकार होणार नाही. त्यामुळे व्ही.आय.पी भाविकांची वेळ वेगळी ठेवा आणि सर्वसामान्य भाविकांची दर्शन हे पाहिल्या सारखेच सुरु ठेवा आणि व्ही.आय.पी निश्चित करा. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना दर्शनाची अडचण होणार नाही, ही माझी प्रामाणिक भावना असून ती अंमलात आणायचा प्रयत्न करणार असल्याचे माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी