India Help Myanmar : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी सरसावला भारत

नवी दिल्ली : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी भारत सरसावला आहे. म्यानमारमध्ये भूकंपामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले असून २३७६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. थायलंडमध्ये भूकंपामुळे १० मृत्यू झाले असून ६८ जण जखमी झाले आहेत. चीनमध्ये भूकंपामुळे दोन जण जखमी झाले आहेत. भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.





भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमधील आपल्या दूतावासात हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून दोन्ही देशांतील भूकंप पीडित भारतीयांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.





भूकंपाचा सर्वाधिक फटका म्यानमारला बसला आहे. यामुळे भारत सरकारने तातडीने तंबू, अंथरुण - पांघरुण, स्लीपिग बॅग, अन्नाची पाकिटे, पाण्याची पाकिटे, वैयक्तिक स्वच्छतेसाठीची पाकिटे, जनरेटर, औषधे, वैद्यकीय साहित्य अशी विविध प्रकारची १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला पाठवली आहे.



भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावरुन सी १३० जे या मालवाहक विमानातून १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला रवाना झाली. ही मदत म्यानमारमध्ये पोहोचली आहे. या व्यतिरिक्त भारतीय नौदलाच्या जहाजांमधून ४० टन मदत म्यानमारला पाठवण्यात आली आहे.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे