नवी दिल्ली : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी भारत सरसावला आहे. म्यानमारमध्ये भूकंपामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले असून २३७६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. थायलंडमध्ये भूकंपामुळे १० मृत्यू झाले असून ६८ जण जखमी झाले आहेत. चीनमध्ये भूकंपामुळे दोन जण जखमी झाले आहेत. भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.
भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमधील आपल्या दूतावासात हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून दोन्ही देशांतील भूकंप पीडित भारतीयांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.
भूकंपाचा सर्वाधिक फटका म्यानमारला बसला आहे. यामुळे भारत सरकारने तातडीने तंबू, अंथरुण – पांघरुण, स्लीपिग बॅग, अन्नाची पाकिटे, पाण्याची पाकिटे, वैयक्तिक स्वच्छतेसाठीची पाकिटे, जनरेटर, औषधे, वैद्यकीय साहित्य अशी विविध प्रकारची १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला पाठवली आहे.
भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावरुन सी १३० जे या मालवाहक विमानातून १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला रवाना झाली. ही मदत म्यानमारमध्ये पोहोचली आहे. या व्यतिरिक्त भारतीय नौदलाच्या जहाजांमधून ४० टन मदत म्यानमारला पाठवण्यात आली आहे.
नवी मुंबई : सार्वजनिक सुट्ट्या जोडून आल्या की शासकीय कर्मचारी सहलीसाठी पळ काढतात अथवा गावी…
पुणे : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई - पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली…
मुंबई : देशभरात नावाजलेली व्हीआय (Vodafone Idea) या प्रमुख दूरसंचार कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने 5G सेवा…
अवघ्या ४ वर्षांच्या मुलीला मरणाच्या दारातून परत आणले मुंबई : टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ४ वर्षाच्या…
मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आहे. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल…
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित कोर्टरूम ड्रामा ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट आज (१८ एप्रिलला)…