India Help Myanmar : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी सरसावला भारत

नवी दिल्ली : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी भारत सरसावला आहे. म्यानमारमध्ये भूकंपामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले असून २३७६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. थायलंडमध्ये भूकंपामुळे १० मृत्यू झाले असून ६८ जण जखमी झाले आहेत. चीनमध्ये भूकंपामुळे दोन जण जखमी झाले आहेत. भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.





भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमधील आपल्या दूतावासात हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून दोन्ही देशांतील भूकंप पीडित भारतीयांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.





भूकंपाचा सर्वाधिक फटका म्यानमारला बसला आहे. यामुळे भारत सरकारने तातडीने तंबू, अंथरुण - पांघरुण, स्लीपिग बॅग, अन्नाची पाकिटे, पाण्याची पाकिटे, वैयक्तिक स्वच्छतेसाठीची पाकिटे, जनरेटर, औषधे, वैद्यकीय साहित्य अशी विविध प्रकारची १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला पाठवली आहे.



भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावरुन सी १३० जे या मालवाहक विमानातून १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला रवाना झाली. ही मदत म्यानमारमध्ये पोहोचली आहे. या व्यतिरिक्त भारतीय नौदलाच्या जहाजांमधून ४० टन मदत म्यानमारला पाठवण्यात आली आहे.
Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन