Salman Khan : सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खानने वापरले राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ, मुसलमान धर्मगुरु भडकले

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा सिकंदर नावाचा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा २०० कोटी रुपये खर्चून केलेला चित्रपट चालावा यासाठी सलमानची धडपड सुरू आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अर्थात जाहिरातबाजीसाठी सलमानने जेकब अँड कंपनीने तयार केलेले राम जन्मभूमी येथील राम मंदिराचे आणि हनुमान गढीच्या बजरंग बलीचे चित्र असलेले मनगटी घड्याळ वापरुन फोटोशूट केले. या फोटोशूटवरुन वाद सुरू झाला आहे.





सलमान खानने राम जन्मभूमी येथील राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ वापरल्यामुळे धर्मगुरु आणि कट्टर मुसलमान भडकले आहेत. अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष आणि बरेलीतल्या मुसलमानांचे धर्मगुरु मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी सलमानच्या कृतीचा निषेध केला. सलमान खानने राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ घालून इस्लाममध्ये निषिद्ध असलेली कृती केल्याचे रझवी म्हणाले. जर मुसलमानांना स्वाभिमान असेल आणि ते मुसलमान असतील तर त्यांनी सलमानचा चित्रपट बघू नये; असे आवाहन कट्टर मुसलमान अशी ओळख मिरवणाऱ्या मिर्झा बेगने केले आहे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेकब अँड कंपनीने राम मंदिराचे चित्र असलेली फक्त ४९ घड्याळं तयार केली. यातील एक घड्याळ सलमानला त्याची आई सुशीला चरक म्हणजेच सलमा खान यांनी भेट म्हणून दिले आहे. राम मंदिराचे चित्र असलेले एक घड्याळ अभिषेक बच्चन पण वापरत आहे.



जेकब अँड कंपनीविषयी थोडक्यात माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराचे चित्र असलेली ४९ घड्याळं तयार करणारी जेकब अँड कंपनी जेकब अराबो नावाच्या बुखारियन ज्यू व्यक्तीची आहे. इस्रायलला पाठिंबा देत असल्यामुळे अधूनमधून त्याच्यावर कट्टर मुसलमान टीका करत असतात.



सिकंदर चित्रपटाची कथा

सिकंदर हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित असलेल्या या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन आणि ड्रामा आहे. मुरुगदाससोबत सलमानचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि चाहत्यांना चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा