Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! आणखी ३ एफआयआर दाखल

मुंबई : विनोदी कलाकार कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादाचे चित्र निर्माण झाले होते. शिंदेसेनेचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थकांकडून कुणाल कामराच्या स्टुडीओची देखील तोडफोड करण्यात आली होती. अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विनोदी कलाकार कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यातच आता कामराच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे समोर आले आहे.



विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध महाराष्ट्रात आणखी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मनमाड, नाशिक येथील मयूर बोरसे; जळगाव जामोद, बुलढाणा येथील संजय भुजबळ; आणि नांदगाव मनमाड, नाशिक येथील सुनील जाधव या शिवसेनेच्या सदस्यांनी कामरा विरोधात तीन नवीन एफआयआर दाखल केले आहेत. 'कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नैतिक वर्तनाची बदनामी अपमानास्पद विधाने करून दोन्ही राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केला' असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.


एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली नवीन एफआयआर देखील नोंदवण्यात आले आहेत, ज्यात ३५३(१)(ब), ३५३(२) (सार्वजनिक गैरवर्तन करणारे विधान) आणि ३५६(२) (बदनामी) यांचा समावेश आहे. खार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खार पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोनदा बोलावले आहे पण तो अद्याप हजर झालेला नाही. यानंतर, त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी ३१ मार्च रोजी समन्स बजावले आहे.



वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही - कुणाल कामरा


कुणाल कामरा याने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीत. नंतर, त्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकार आणि मंत्र्यांवर टीका करणारे आणखी व्हिडिओ देखील शेअर केले.

Comments
Add Comment

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून