Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! आणखी ३ एफआयआर दाखल

मुंबई : विनोदी कलाकार कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादाचे चित्र निर्माण झाले होते. शिंदेसेनेचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थकांकडून कुणाल कामराच्या स्टुडीओची देखील तोडफोड करण्यात आली होती. अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विनोदी कलाकार कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यातच आता कामराच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे समोर आले आहे.



विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध महाराष्ट्रात आणखी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मनमाड, नाशिक येथील मयूर बोरसे; जळगाव जामोद, बुलढाणा येथील संजय भुजबळ; आणि नांदगाव मनमाड, नाशिक येथील सुनील जाधव या शिवसेनेच्या सदस्यांनी कामरा विरोधात तीन नवीन एफआयआर दाखल केले आहेत. 'कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नैतिक वर्तनाची बदनामी अपमानास्पद विधाने करून दोन्ही राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केला' असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.


एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली नवीन एफआयआर देखील नोंदवण्यात आले आहेत, ज्यात ३५३(१)(ब), ३५३(२) (सार्वजनिक गैरवर्तन करणारे विधान) आणि ३५६(२) (बदनामी) यांचा समावेश आहे. खार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खार पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोनदा बोलावले आहे पण तो अद्याप हजर झालेला नाही. यानंतर, त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी ३१ मार्च रोजी समन्स बजावले आहे.



वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही - कुणाल कामरा


कुणाल कामरा याने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीत. नंतर, त्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकार आणि मंत्र्यांवर टीका करणारे आणखी व्हिडिओ देखील शेअर केले.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद