Gudi Padwa 2025 : बांबूंच्या काठ्यांचे वाढले दर

खोपोली : मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे. नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार, हे नुतन पंचांगात नमुद केले आहेच महाराष्ट्रात गुढी उभारून या नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मात्र, आता या गुढीला लागणाऱ्या नव्या बांबूंची किंमत दुप्पटीने वाढली आहे हेही तितकेच खरे आहे. शहरी भागात तर बांबूंची काठी मिळणे दुरापास्त झाले आहे. बव्हंशी बांबूकाठी ग्रामीण भागातून मिळते. पण वाढतं प्रदूषण, माकडांचा उपद्रव आणि काटा येणे आदी कारणांमुळे बांबूचे उत्पादन घटत चालले आहे.



कोकणात बांबूला मानगा, चिवा आदी नावानेही ओळखले जाते. हा बांबू कुंपणाच्या कडेने उगवतो. काही ठिकाणी याची शास्त्र शुद्ध लागवड केली जाते मात्र वाढत्या महागाईमुळे, याची लागवड करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. मिरगानंतर कोंब येतात, त्यावेळी ते कोंब माकड- हत्ती फस्त करतात. याचा परिणाम सलग वाढीवर होतो. बांबूला बुरूड कामातही मागणी असते रेती व्यवसाय, मांडव स्टेज डेकोरेशन, काजू-आंबा काढण्याची काठी आदीमुळे बांबूची उचल ठेकेदार मार्फत होते.


सध्याच्या वाढत्या महागाई मुळे बांबूंच्या किमतीवर परिणाम होत आहे त्यात बांबूंची बेटे हवामान व नैसर्गिक कारणांमुळे नष्ट होत आहेत. या नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीला नवीन बांबू उभारण्याची काही ठिकाणी पद्धत आहे, तर काही ठिकाणी पुनर्वापर होतो मात्र, वरील सर्व कारणांमुळे, बांबूंचे दर हे गगगनाला भिडलेले दिसत आहेत.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड