प्रियकराचे लफडे शोधणे आले अंगलट; मुंबईतील महिलेला भोंदू तांत्रिकाने फसवले!

मुंबई : सांताक्रूझ येथील ३२ वर्षीय महिलेला जादूटोण्याचा प्रभाव दूर करण्याच्या बहाण्याने एका तांत्रिकाने (Bhondu Baba) ३.४७ लाख रुपयांना गंडा घातला. पीडित महिलेची ओळख या तांत्रिकाशी इन्स्टाग्रामद्वारे झाली होती. तिच्या प्रियकरावर दुसऱ्या मुलीने 'करणी' केली असल्याचे सांगत तांत्रिकाने विविध विधींसाठी या महिलेकडून पैसे उकळले. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


पीडित महिलेची २०२४च्या ऑक्टोबरमध्ये एका युवकाशी ओळख झाली होती. हा युवक मूळचा उत्तर प्रदेशचा असून ठाण्यात राहतो. तक्रारदार महिलेच्या मते, या ओळखीचे पुढे प्रेमात रुपातर झाले. पुढे जेव्हा जेव्हा ती आपल्या प्रियकराला भेटायची, तेव्हा तो तिच्यासमोर फोन कॉल्स टाळायचा, त्यामुळे तिला त्याच्यावर अफेअर असल्याचा संशय आला.



याच संशयाच्या भूताने पछाडलेल्या या महिलेने, जानेवारी २०२५ मध्ये एका ज्योतिषीचा इन्स्टाग्रामवरील स्टोरी पाहिली. तो फक्त २५१ रुपये शुल्क घेऊन वैयक्तिक जीवन, नातेसंबंध आणि करिअरविषयी अचूक माहिती देतो, असा दावा करत होता.


महिलेने आपल्या प्रियकराची माहिती त्या ज्योतिषी-कम-तांत्रिकाला दिली. त्याने सांगितले की, तिच्या प्रियकरावर काळ्या जादूचा प्रभाव आहे आणि तो दूर करण्यासाठी काही विशिष्ट विधी करावे लागतील. हळूहळू तांत्रिकाने वेगवेगळ्या विधींसाठी एकूण ५३ व्यवहारांमध्ये तिच्याकडून ३.४७ लाख रुपये घेतले.



तांत्रिकाने पुढे राजस्थानला येऊन होम-हवन आदी मोठ्या पूजेसाठी बोलावले, मात्र महिलेने जाण्यास नकार दिला. त्यानंतर तांत्रिकाने मुंबईत येण्याचे आश्वासन दिले, पण अनेक दिवस झाले तरी तो आला नाही. तसेच तिच्या प्रियकराच्या वागण्यात काहीही फरक पडत नसल्याने अखेर तिला फसवणुकीचा संशय आला. तिने वाकोला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.


वाकोला पोलिसांनी भा.द.वि.सं. आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली तांत्रिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने सज्ज आणि सक्षम