डमी शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर सीबीएसई घालणार आळा

नवी दिल्ली : अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. आता या विद्यार्थ्यांना आणि डमी शाळांना आळा घालण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पाऊल उचलले आहे. अशा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसू देणार नाही. यासंबंधीच्या नियमाची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असल्याचे समजते. डमी शाळांवर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. या नियमामुळे परीक्षेला मुकलेले विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (एनआयओएस)द्वारे आयोजित परीक्षा देऊ शकतील.



सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीएसईच्या पथकाद्वारे संलग्नित शाळांची अचानक तपासणी केली जाते. या तपासणीवेळी विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच विद्यार्थांची ही गैरहजेरी सततची असेल, तर बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसू दिले जाणार नाही. या संबंधीच्या उपनियमांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल केले जाण्याची तयारी सुरू आहे. नियमित शाळेत न गेल्यामुळे परीक्षेला बसता आले नाही. तर जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर आणि त्याच्या पालकांवर असेल. सीबीएसईच्या नुकत्याच झालेल्या गव्हर्निंग बोर्डाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीत हा निर्णय शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ पासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे समजते. महाराष्ट्रात यापुढे जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याची राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा