डमी शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर सीबीएसई घालणार आळा

  65

नवी दिल्ली : अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. आता या विद्यार्थ्यांना आणि डमी शाळांना आळा घालण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पाऊल उचलले आहे. अशा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसू देणार नाही. यासंबंधीच्या नियमाची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असल्याचे समजते. डमी शाळांवर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. या नियमामुळे परीक्षेला मुकलेले विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (एनआयओएस)द्वारे आयोजित परीक्षा देऊ शकतील.



सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीएसईच्या पथकाद्वारे संलग्नित शाळांची अचानक तपासणी केली जाते. या तपासणीवेळी विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच विद्यार्थांची ही गैरहजेरी सततची असेल, तर बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसू दिले जाणार नाही. या संबंधीच्या उपनियमांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल केले जाण्याची तयारी सुरू आहे. नियमित शाळेत न गेल्यामुळे परीक्षेला बसता आले नाही. तर जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर आणि त्याच्या पालकांवर असेल. सीबीएसईच्या नुकत्याच झालेल्या गव्हर्निंग बोर्डाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीत हा निर्णय शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ पासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे समजते. महाराष्ट्रात यापुढे जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याची राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )