डमी शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर सीबीएसई घालणार आळा

नवी दिल्ली : अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. आता या विद्यार्थ्यांना आणि डमी शाळांना आळा घालण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पाऊल उचलले आहे. अशा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसू देणार नाही. यासंबंधीच्या नियमाची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असल्याचे समजते. डमी शाळांवर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. या नियमामुळे परीक्षेला मुकलेले विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (एनआयओएस)द्वारे आयोजित परीक्षा देऊ शकतील.



सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीएसईच्या पथकाद्वारे संलग्नित शाळांची अचानक तपासणी केली जाते. या तपासणीवेळी विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच विद्यार्थांची ही गैरहजेरी सततची असेल, तर बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसू दिले जाणार नाही. या संबंधीच्या उपनियमांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल केले जाण्याची तयारी सुरू आहे. नियमित शाळेत न गेल्यामुळे परीक्षेला बसता आले नाही. तर जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर आणि त्याच्या पालकांवर असेल. सीबीएसईच्या नुकत्याच झालेल्या गव्हर्निंग बोर्डाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीत हा निर्णय शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ पासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे समजते. महाराष्ट्रात यापुढे जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याची राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या