Crime : पुण्यातील तरुणीची बंगळुरूत हत्या; तुकडे करुन बॅगेत भरले

  69

पुणे : महाराष्ट्रातील पुणे आणि कर्नाटकमधील बंगळुरू ही दोन्ही शहरे आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक मराठी - अमराठी तरुणी तरुणी या दोन्ही शहरांमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातून आणि बंगळुरूतून अनेकदा आयटी क्षेत्राशी संबंधित आनंदवार्ता तसेच बड्या कंपन्यांच्या विविध घोषणांच्या बातम्या येत असतात. पण यावेळी पुणे आणि बंगळुरू ही दोन्ही शहरे भलत्याच कारणामुळे चर्चेत आहेत.



पुण्याची गौरी राकेश खेडेकर पती राकेश राजेंद्र खेडेकर सोबत बंगळुरूत वास्तव्यास होती. गौरी आणि राकेश बंगळुरूत स्थायिक होऊन जेमतेम महिना उलटला होता. तोच बंगळुरूतून एक धक्कादायक बातमी आली. राकेशने गौरीची हत्या केली. हत्या केल्यानंतर राकेशने गौरीच्या शरीराचे छोटे तुकडे केले आणि ते बॅगेत भरले. बॅग घरात ठेवून राकेशने घर मालकाला फोन केला आणि स्वतःच घटनेची माहिती दिली. फोन कट केल्यानंतर राकेश फरार झाला. हत्येची माहिती मिळताच घर मालकाने तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी राकेशचे घर गाठले. घर मालकाच्या चावीने दरवाजा उघडून पोलीस घरात गेले. तिथे बॅगेत गौरीच्या शरीराचे तुकडे बघून पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवला.



फरार झालेला राकेश पुण्यातल्या घरी पोहोचला. पुण्यातल्या घरी आल्यावर राकेशने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण राकेशला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार केल्यामुळे राकेश वाचला. तोपर्यंत बंगळुरू पोलिसांचे पथक राकेशचा शोध घेत पुण्यात पोहोचले होते. पोलिसांकडून राकेशच्या कृत्याची माहिती मिळताच त्याच्या नातलगांना जबर धक्का बसला. बंगळुरू पोलिसांनी पुणे पोलिसांना आणि राकेशच्या नातलगांना सर्व माहिती दिली आहे. आता तब्येत सुधारल्यावर डॉक्टरांच्या परवानगी बंगळुरू पोलीस राकेशचा ताबा घेणार आहेत. गौरीच्या हत्येप्रकरणी आधी राकेशची चौकशी होईल. नंतर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.



हाती आलेल्या वृत्तानुसार, पुण्यात पोहोचल्यानंतर राकेशने झुरळ मारण्याचे औषध आणि फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले