Navi Mumbai : नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज बंद!

नवी मुंबई : नवी मुंबईकरांनो पाण्याचा अपव्यय टाळा. ऐन उन्हाळ्यात नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज (शुक्रवार २८ मार्च) बंद राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत सी.बी.डी. बेलापूर, सेक्टर २८ येथे काल (दि २७) गळती सुरू झाली. सदर ठिकाणी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम आज (दि २८) शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा आज (दि २८) रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद करावा लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास आणि सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे येथे होणारा आज संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी २९ मार्च रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचं महापालिकाने सांगितलं आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान याचा फटका नवी मुंबईकरांना बसणार आहे.

Comments
Add Comment

चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील

BMC : मुंबईत सव्वा लाख मुलींना देणार एचपीव्ही लस

- राष्ट्रीय मोहिमेचा शनिवारी झाला शुभारंभ - पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांमधील सुमारे २५ हजार मुलींचा

Food delivery staff : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची

मुंबई : राज्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांना यापुढे कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक

आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स

- मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण.... - 'आरबीजी फाउंडेशन-टीव्हीजेए'चा उपक्रम; लालबागचा राजा

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम