नवी मुंबई : नवी मुंबईकरांनो पाण्याचा अपव्यय टाळा. ऐन उन्हाळ्यात नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज (शुक्रवार २८ मार्च) बंद राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत सी.बी.डी. बेलापूर, सेक्टर २८ येथे काल (दि २७) गळती सुरू झाली. सदर ठिकाणी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम आज (दि २८) शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा आज (दि २८) रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद करावा लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास आणि सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे येथे होणारा आज संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी २९ मार्च रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचं महापालिकाने सांगितलं आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान याचा फटका नवी मुंबईकरांना बसणार आहे.
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…