Attack on Hindu : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात, विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना पत्र

माल्दा : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात आहेत. हिंदूंच्या मालमत्तांना लक्ष्य करुन हल्ले करणे, हिंदूंना घाबरवणे असे प्रकार सुरू आहेत. प्रामुख्याने हिंदूंच्या वाहनांना आणि दुकानांना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी तातडीने माल्दामध्ये केंद्रीय सुरक्षा पथकांना बोलवावे, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांना लिहिले आहे. माल्दा जिल्ह्यातील मोथाबारीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मोथाबारीमध्ये तातडीने केंद्रीय सुरक्षा पथकांना नियुक्त करावे, अशीही मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्याकडे केली आहे. राज्यपालांनी केंद्रीय सुरक्षा पथके नियुक्त करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला आवश्यक ते निर्देश द्यावे; अशी मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.



याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करुन मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे हिंदूंवर हल्ला झाल्याचे सुकांत मुजुमदार म्हणाले. या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. ममता बॅनर्जींचे सरकार मुसलमानांचे लांगुलचालन करण्यात मग्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.



पश्चिम बंगालचे पोलीस ममता बॅनर्जी सरकारचे आदेश पाळत असल्यामुळे मुसलमानांनी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसतात. हिंदूंवर मुसलमान हल्ले करत असले तरी पोलीस हे हल्ले थोपवण्यासाठी ठोस उपाय करताना दिसत नाहीत. पश्चिम बंगाल सरकारचे वर्तन हिंदूंसाठी धोकादायक आणि राज्यातील कायदा - सुव्यवस्था बिघडवणारे असे आहे, अशी तक्रार सुवेंदू अधिकारी यांनी केली.
Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या